शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

धुळे तालुक्यात डाळींब बागा वाचविण्यासाठी आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 13:02 IST

पाणी टंचाईचा फटका : पाण्याअभावी नुकसान; कापडणे परिसरातील शेतकरी हवालदिल

 कापडणे, दि.26- धुळे तालुक्यातील कापडणे व देवभाणे शिवारात पाणी टंचाईमुळे डाळींब बागांना अपेक्षित असलेले पाणी देता येत नसल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. परिणामी, रणरणत्या उन्हात डाळींब बागा कोरडय़ा पडत असून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतात लागवड केलेल्या डाळींब बागा वाचविण्यासाठी येथील शेतकरी त्यांचा जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. 

कापडणे व देवभाणे शिवारातील शेतकरी मच्छिंद्र मधुकर माळी, अशोक जिजाबराव देसले, विठ्ठल शंकर देसले, रामकृष्ण मुरलीधर पाटील, संजय युवराज पाटील, उदय धनराज पाटील, सुशील माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रमेश माळी, अरूण पुंडलिक पाटील आदी शेतक:यांनी त्यांच्या शेतात डाळींबाची लागवड केली आहे. 
प्रशासनाचे सहकार्य नसल्याने शेतक:यांना फटका 
येथील डाळींब उत्पादक शेतकरी मच्छिंद्र माळी या शेतक:याने देवभाणे शिवारातील गट नं. 70/2 येथील बोअरवेलचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडील त्यांच्या गट क्रमांक 161 शेतातील विहिरीत पाईपलाईनद्वारे आणण्याचे नियोजन केले होते. परंतु, या कामामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला परवानगी नाकारली. त्यामुळे आता डाळींब बागा वाचविण्याचे आव्हान मच्छिंद्र माळी यांच्यासह इतर शेतक:यांसमोर उभे ठाकले आहे. 
330 झाडे पाण्याअभावी करपली 
कापडणे येथील देवभाणे शिवारात मच्छिंद्र माळी या शेतक:याने 1 हेक्टर जमिनीत डाळींबाची 630 डाळींबाच्या झाडांची लागवड केली होती. परंतु, त्या शेतक:याच्या शेतातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून गेली आहेत. उर्वरीत 330 झाडे पाणी टंचाईमुळे करपून कोरडली पडल्यामुळे नाईलाजाने त्या शेतक:याला करपलेली डाळींबाचे झाडे उपटून फेकून द्यावे लागले आहे.