शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

दमदार पावसाशिवाय खरिपाची पेरणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 15:54 IST

प्रभारी कृषी अधीक्षकांचा सल्ला : जिल्ह्यासाठी पुरेशाप्रमाणात बियाणे मिळणार

ठळक मुद्देअद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही७० ते ८० मि.मी.पाऊस झाल्यावरच पेरणी करावीकापसाचे क्षेत्र घटणार

धुळे : मृग नक्षत्र सुरू झालेले असले तरी जिल्हयात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये. ७० ते ८० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी खरिपाची पेरणी करावी असा सल्ला धुळे जिल्ह्याचे प्रभारी कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिला आहे. दरम्यान खरीपासाठी जिल्हयात बियाण्यांची कुठलीही कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी सरासरी एवढाच पाऊस होईल, असा अंदाज हवामान खाते व स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीची तयारीही केली आहे. २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. गेल्या आठवड्यात मान्सुनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकºयांनी पेरणीलाही सुरवात केली आहे. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या आगमनात पुन्हा खंड पडलेला आहे. आता पेरणी करून पावसाने दडी मारल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होत असते. त्यामुळे शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये. किमान ७० ते ८० मि.मी.पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी असे आवाहन संभाजी ठाकूर यांनी शेतकºयांना केले आहे. पुरेसे बियाणे मिळणार खरिप हंगामासाठी ४८ हजार ९७० क्विंटल विविध पिकांचे बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. त्यानुसार बियाणे उपलब्ध होणार असून, बियाण्यांची चणचण भासणार नाही. तसेच ८ लाख ४० हजार कापूस बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली होती. त्यापैकी ६ लाख कापूस बियाण्यांची पाकीटे उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. कापसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यात दरवर्षी २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होत असते. मात्र २०१८-१९च्या खरिपाच्या हंगामात हे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणे अपेक्षित आहे. तर मक्याचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. ३५० पाकिटे विक्रीस बंदी बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात पाच पथकांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात धुळे, शिरपूर, व साक्री येथे विना लायसन्सची ३५० बीटी बियाण्यांची पाकीटे आढळून आली. ती पाकिटे विक्री बंदचे आदेश देण्यात आलेले आहे. बोगस बियाण्यांबाबत कोणाची तक्रार असल्यास, त्यांनी तालुका कृषी कार्यालय अथवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती