शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

ठरावीक प्रभागातच विकासकामांना प्राधान्य दिल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

शुक्रवारी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत झालेल्या नाराजी नाट्यानंतर नगरसेवक शीतल नवले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विविध ...

शुक्रवारी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत झालेल्या नाराजी नाट्यानंतर नगरसेवक शीतल नवले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देत आपली भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असा -

प्रश्न - शहरात दोन वर्षांत विकासकामे झालेली नाहीत का?

उत्तर : महानगरात १९ प्रभाग आहेत. असे असताना महानगरातील ठरावीकच दोन प्रभागांमध्ये विकासकामे केली जातात. त्यामुळे अन्य प्रभागांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मिल परिसर व अल्पसंख्याक प्रभागात मोठ्या प्रमाणात श्रमजीवी व कष्टकरी नागरिक राहतात. त्यांना आजही मोठ्या प्रमाणात मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या मार्गी लागावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही.

महापौर निवडीला अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर विरोध का?

उत्तर : महापाैरपदाला माझा मुळीच विराेध नाही. माझे म्हणणे एवढेच आहे. की नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, अर्थंसंकल्पात आम्ही सुचविलेली कामे आली पाहिजे. मात्र तसे होत नाही. आम्ही सांगितलेल्या कामांचा समावेश होत नाही. त्यामुळे इतिवृत्ताचे अवलोकन केले जावे. इतिवृत्तात प्रत्येक सदस्यांचे म्हणणे लिहिले जावे, अशी अपेक्षा आहे. इतिवृत्त मिळण्यासाठी लेखी स्वरूपात माहिती मागविली आहे. यापुढील सभेेत वास्तववादी बजेट सादर झाले नाही तर आंदोलनाला बसेन.

भाजपकडून तुम्हाला पद देण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे?

उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी भाजपात आलो आहे. पक्षाकडून पद मिळेल अशी अपेक्षाही कधी केलेली नाही आणि पदासाठी राजकारणातही आलेलो नाही. आमच्या परिवारात यापूर्वी महापाैरपद मिळालेले आहे. महापाैर होऊ शकलो नाही, पण महापाैरांचा मुलगा असल्याची तरी माझी ओळख आहे. पक्षाकडून पद मिळाले किंवा नाही हा नशिबाचा भाग आहे. पक्षाला वाटत असेल तर विचार करावा.

खडसेंना भेटल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटल्याची केवळ अफवा आहे. माध्यम किंवा समाजात चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. माझे वडील मोहन नवले राष्ट्रवादीचे महापाैर असतानादेखील मी कधी राजकारणात आलो नाही किंवा तेव्हाही राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतलेले नव्हते. तरी कुणीही गैरसमज करून घेऊ नये.

आगामी महापाेैरदेखील भाजपचा

जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर धुळ्यातही सत्तांतर होईल असे मला तरी नाही वाटत. भाजपचे सर्व नगरसेवक एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आगामी महापाैर हादेखील भाजपचाच होईल यात शंका नाही.