शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जलयुक्त शिवार’वर आमदारांचा अविश्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:43 IST

‘धुळे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती अधिकारी चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिका:यांना सादर करीत असल्याचा आरोप आमदारांनी केला़

‘धुळे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती अधिकारी चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिका:यांना सादर करीत असल्याचा आरोप करीत चारही तालुक्याच्या आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेवर अविश्वास दाखविला़ नियोजन समितीच्या बैठकीत जलयुक्त शिवार वगळता अन्य विषयांवर नावालाच विचारमंथन झाल़े

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडली़ या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, मनपा आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्यासह आमदार अनिल गोटे, जयकुमार रावल, अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, डी़एस़ अहिरे, कुणाल पाटील उपस्थित होत़े

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस 1 तास विलंबाने दुपारी चार वाजता सुरुवात झाली़ बैठकीच्या प्रारंभी आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी सज्रेराव दराडे यांना तत्काळ हटविण्याची मागणी केली़ कोणालाही विश्वासात न घेता काम करणारे दराडे पुढील बैठकीत दिसता कामा नये, असे सांगत शिवाजीराव दहिते, मधुकर गर्दे व अन्य सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली़ पालकमंत्र्यांनी याबाबत शासनाकडे कारवाईची मागणी करण्याचे आश्वासन दिल़े

बैठकीत आमदार अनिल गोटे यांनी जलयुक्त शिवार योजनेत पोकलॅण्ड खरेदी का झालेले नाही? असा प्रश्न उपस्थित केला़ त्यावर संबंधित विभागाच्या अधिका:यांना जाब विचारत जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी 15 फेब्रुवारीच्या आत हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल़े जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी जलयुक्त शिवार योजनेत कोणत्या विभागाला किती निधी दिला, तसेच संबंधित विभागांनी किती खर्च केला? हे तपासण्याची मागणी केली़ तर आमदार अमरिशभाई पटेल यांनी जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन योग्य नसल्याचा आरोप केला़ ही योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या कृषी व वनविभागाकडे तांत्रिक मनुष्यबळ आहे किंवा नाही हे तपासण्याची मागणी पटेल यांनी केली़

आमदार कुणाल पाटील यांनीदेखील जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त करीत या योजनेचा 90 टक्के निधी वाया गेल्याचा आरोप केला़ जलयुक्त शिवार योजनेत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नाही, असेही ते म्हणाल़े मधुकर गर्दे यांनी जलयुक्त योजनेसाठी होणारी शिवारफेरी अधिकारी कार्यालयात बसून करीत असल्याचा आरोप करीत सर्वाना विश्वासात घेऊन काम व्हायला हवे, असे मत मांडल़े जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचे सांगत दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केल़े

माजी आमदार शरद पाटील यांनी अक्कलपाडा धरणाचे पाणी गोंदूर तलावात आणण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला़ परंतु त्याबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय आला असून त्यात तांत्रिकदृष्टय़ा ही योजना योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव नामंजूर केल्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाल़े

गॅङोटसाठी निधीची मागणी

धुळे जिल्ह्याचे स्वतंत्र गॅङोट तयार करण्यासाठी संपादक मंडळ नियुक्त करण्याबरोबरच 10 लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी आमदार जयकुमार रावल यांनी केली़ तर मनपाचे नगरसेवक दीपक शेलार व अमोल मासुळे यांनी नगरोत्थान योजनेबाबत विचारणा केली़

मात्र मनपाच्या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल़े वीज योजनांबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली़ जिल्हा नियोजन समितीची बैठक सायंकाळी उशिरार्पयत सुरूच होती, मात्र जलयुक्त शिवार व्यतिरिक्त अन्य विषयांवर विशेष चर्चा झाली नाही़