शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातामध्ये वाढले मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र ...

कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून काही निर्बंध लावले गेले़ त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने रस्त्यावरची वर्दळ थांबली़ धावणारे महामार्गदेखील थांबले़ शहरातील गर्दी कमी झाल्याने अपघाताच्या संख्येत घट झाली़ जे काही अपघात झाले ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच झाले़

आता कोरोनाचा काळ तसा संपुष्टात आलेला आहे़ कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाकडून लावलेले निर्बंधदेखील बऱ्याच प्रमाणावर हटविण्यात आलेले आहेत़ रस्त्यावरील वर्दळ पुन्हा वाढल्याने अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी; पण...

- कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर रस्त्यावरची वर्दळ हटविण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते़ त्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला़ परिणामी, वर्दळ थांबल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट झाली़

- अपघातदेखील कमी झाले असले तरी कोरोनाचा त्रास मात्र अनेकांना असह्य करून गेला़ त्यात काही जणांनी स्वत:ला सावरले तर काही जणांनी आपला प्राण त्यागला़ अपघात आणि कोरोना हे एकसारखे ठरले़

पायी चालणाऱ्या

व्यक्तींनाही धोका

- कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी अपघात होईल हे आजच्या या धावपळीच्या जगात कोणीही सांगू शकत नाही़ अगदी आपण पायी चालत असताना आपल्या पाठीमागून वेगाने येणारे वाहन आपल्याला धडकून केव्हा निघून जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही़

मृतांमध्ये सर्वाधिक

तरुणांचा समावेश

- वाहने अतिशय वेगाने चालविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे़ हे कोणीही नाकारू शकत नाही़ शहरात आणि महामार्गावर त्यांचे वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण बऱ्यापैकी म्हणावे लागेल़ त्यांच्यामुळे अपघात इतका मोठा होता की अक्षरश: स्वत:चा अथवा दुसऱ्याचा जीव घेतो़

वेळ मौल्यवान; पण जीवन अमूल्य

- वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी़ आपल्यामुळे स्वत:ला आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही याकडे देखील गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़

-केतन चौधरी

- शहरात प्रत्येकाने वाहन हे वेगाची मर्यादा सांभाळून चालविण्याची गरज आहे; पण महामार्गाप्रमाणे वाहने वेगाने चालविली जातात़ अपघाताला वेग हेच कारण म्हणावे लागेल़

-महेश सोनवणे