शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातामध्ये वाढले मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र ...

कोरोनाचा काळ हा जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता़ टप्प्या-टप्प्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून काही निर्बंध लावले गेले़ त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने रस्त्यावरची वर्दळ थांबली़ धावणारे महामार्गदेखील थांबले़ शहरातील गर्दी कमी झाल्याने अपघाताच्या संख्येत घट झाली़ जे काही अपघात झाले ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच झाले़

आता कोरोनाचा काळ तसा संपुष्टात आलेला आहे़ कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाकडून लावलेले निर्बंधदेखील बऱ्याच प्रमाणावर हटविण्यात आलेले आहेत़ रस्त्यावरील वर्दळ पुन्हा वाढल्याने अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी; पण...

- कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर रस्त्यावरची वर्दळ हटविण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते़ त्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला़ परिणामी, वर्दळ थांबल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट झाली़

- अपघातदेखील कमी झाले असले तरी कोरोनाचा त्रास मात्र अनेकांना असह्य करून गेला़ त्यात काही जणांनी स्वत:ला सावरले तर काही जणांनी आपला प्राण त्यागला़ अपघात आणि कोरोना हे एकसारखे ठरले़

पायी चालणाऱ्या

व्यक्तींनाही धोका

- कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी अपघात होईल हे आजच्या या धावपळीच्या जगात कोणीही सांगू शकत नाही़ अगदी आपण पायी चालत असताना आपल्या पाठीमागून वेगाने येणारे वाहन आपल्याला धडकून केव्हा निघून जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही़

मृतांमध्ये सर्वाधिक

तरुणांचा समावेश

- वाहने अतिशय वेगाने चालविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे़ हे कोणीही नाकारू शकत नाही़ शहरात आणि महामार्गावर त्यांचे वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण बऱ्यापैकी म्हणावे लागेल़ त्यांच्यामुळे अपघात इतका मोठा होता की अक्षरश: स्वत:चा अथवा दुसऱ्याचा जीव घेतो़

वेळ मौल्यवान; पण जीवन अमूल्य

- वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी़ आपल्यामुळे स्वत:ला आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही याकडे देखील गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे़

-केतन चौधरी

- शहरात प्रत्येकाने वाहन हे वेगाची मर्यादा सांभाळून चालविण्याची गरज आहे; पण महामार्गाप्रमाणे वाहने वेगाने चालविली जातात़ अपघाताला वेग हेच कारण म्हणावे लागेल़

-महेश सोनवणे