शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

धुळे महानगरपालिकेने  केली एका महिन्यात तब्बल पाच हजार तक्रारींची सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:18 IST

 ‘स्वच्छता अ‍ॅप’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देमनपाने २४ तासाच्या आत केली समस्यांची सोडवणूकनागरिकांनी मनपाच्या कामावर व्यक्त केले समाधानतक्रारी सोडविल्याने, मनपाचा देशात ७०वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेत वारंवार चकरा मारून, निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याच्या तक्रारींची संख्या शहरात कमी नाही़ मात्र असे असतांनाच मनपा प्रशासनाने ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या माध्यमातून एकाच महिन्यात तब्बल ५ हजार तक्रारींची सोडवणूक केली आहे़ मनपा यंत्रणेच्या या कार्यतत्परतेमुळे वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत़महापालिकेला स्वच्छ महाराष्ट्र २०१८ अंतर्गत केंद्र सरकारच्या स्वच्छता अ‍ॅपची जनजागृती करावयाची असून त्या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त होणाºया तक्रारींची २४ तासांत सोडवणूक करावयाची आहे़ अ‍ॅपच्या माध्यमातून होणाºया तक्रारींच्या सोडवणूकीनुसार मनपाला देशातील अन्य शहरांच्या तुलनेत रॅकींग मिळत आहे़ दरम्यान, मनपाने ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत तब्बल ५ हजार ५२० तक्रारींची सोडवणूक २४ तासांच्या आत केली आहे़ सदर तक्रारी स्वच्छतेसंदर्भातील आहेत़ शिवाय या अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी सोडविण्यात आल्यानंतर तक्रारकर्त्यांना मनपाच्या कामाबाबत प्रतिक्रिया देता येत       आहे़ त्यानुसार अ‍ॅपच्या माध्यमातून १ हजार ८७ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यापैकी १ हजार ४८ नागरिकांनी मनपाच्या कामावर समाधान व्यक्त केले असून २९ नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे़ तर १० नागरिकांनी तटस्थ भुमिका घेतली आहे़ आतापर्यंत ४ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे़ तर ३१ डिसेंबरपर्यंत ७ हजार नागरिक अ‍ॅप डाऊनलोड करतील असे लक्ष्य मनपाने ठेवले असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ एकाच महिन्यात अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसह तक्रारींच्या संख्येत भली मोठी वाढ झाली असल्याने व मनपाने तितक्याच तत्परतेने या तक्रारी सोडविल्याने मनपाचा देशात ७० वा क्रमांक सध्या आहे़