शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापौर निवड, आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST

पक्षीय बलाबल पाहता, महापौर पदावर भाजपचे प्रदीप कर्पे यांची निवड होणार असे दिसते. मात्र भाजपमधील नगरसेवकांमध्ये महापौर निवडीवरून असलेल्या ...

पक्षीय बलाबल पाहता, महापौर पदावर भाजपचे प्रदीप कर्पे यांची निवड होणार असे दिसते. मात्र भाजपमधील नगरसेवकांमध्ये महापौर निवडीवरून असलेल्या नाराजीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांच्यातील काही नेते तर उलटफेर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे दमन येथे मुक्कामी असलेले नगरसेवक गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी सरळ सभेला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे.

पाच जणांचे अर्ज

सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपाकडून नगरसेवक प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून मदिना समशेर पिंजारी, शिवसेनेतर्फे ज्योत्स्ना पाटील, तर एमआयएमच्या सईदा इकबा अन्सारी यांचा आणि अपक्ष म्हणून नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल यांचा अर्ज दाखल आहे.

सकाळी ११ वाजता विशेष सभेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. छाननीनंतर उमेदवारी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. माघारीनंतर मतदानाला सुरुवात होणार आहे.

भाजपातील काही नगरसेवकांची नाराजी

भाजपात महापौर पदावरून काही नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. काहींनी ती उघडपणे व्यक्तही केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाचे सर्व नगरसेवक हे दमण येथे एका रिसोर्टमध्ये मुक्कामी आहेत. त्याठिकाणीसुद्धा नगरसेवकांमध्ये दोनदा वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मतदानाच्या वेळी जर ही नाराजी उमटली, तर महापौर पदाच्या निवडीत चुरस निर्माण होऊ शकते. पण नाराज नगरसेवकांची संख्या ही कमी असल्याने भाजपाचे नेते कर्पेंची निवड महापौरपदी निश्चित असल्याचे सांगत आहेत.

महाविकास आघाडीचे प्रयत्न

महापौर पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल असले तरी, माघारीच्या वेळेस शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्ना पाटील यांच्या समर्थनात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार यांनी माघार घेतली असे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीतर्फे भाजपातील नाराज नगरसेवकांच्या गटाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडीला भाजपाच्या १५ नगरसेवकांच्या गटाच्या पाठिंब्याची गरज आहे. तसे झाले तरच आघाडी महापाैर पदासाठी आवश्यक मॅजिक फिगरपर्यंत पोहोचू शकेल. एकूणच महाविकास आघाडीला ही फिगर गाठण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीत कागदावर आज तरी भाजपाचे पारडे जड आहे.