शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: अहो आश्चर्यम, रेल्वेची तिकीटे संपली, शेकडो प्रवाशांनी केला मोफत प्रवास, भोरस स्थानकावरील प्रकार

By सचिन देव | Updated: February 27, 2024 16:20 IST

Indian Railway News: प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करावा, अन्यथा टीटीईकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येते. मात्र, मंगळवारी चाळीसगावहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मेमू गाडीचा भोरस स्टेशनवरील तिकीटांचा कोटांच संपल्याचा प्रकार घडला.

- सचिन देव धुळे -  प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करावा, अन्यथा टीटीईकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येते. मात्र, मंगळवारी चाळीसगावहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मेमू गाडीचा भोरस स्टेशनवरील तिकीटांचा कोटांच संपल्याचा प्रकार घडला. यामुळे २०० हुन अधिक प्रवाशांनी गार्डच्या संमतीनेच भोरस ते बोरविहीर पर्यंत मोफत प्रवास केला. काही प्रवाशांनी टीटीई पकडेल, या भीतीने तिकीट देण्याची मागणी केली. मात्र, तिकीटचं शिल्लक नाही तर कुठून देणार, असे म्हणत हतबलता दाखवून या गार्डने प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली.

भुसावळ रेल्वे विभागातील चाळीसगाव ते धुळे दरम्यान दिवसातुन चारवेळा मेमू गाडी धावते. चाळीसगाहुन बसणाऱ्या प्रवाशांना या गाडीचे तिकीट चाळीसगाव स्टेशनवरच मिळते. मात्र, या गाडीच्या मार्गावर थांबा असलेल्या `भोरस बुद्रूक ` या रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी नसल्यामुळे, या गाडीच्या गार्डमार्फत प्रवाशांना तिकीटे दिली जातात. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे ही गाडी चाळीसगाव स्टेशनहुन निघून, भोरस बुद्रूक स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांनी तिकीटे काढण्यासाठी गार्डकडे एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे कधी नव्हे ३०० ते ४०० प्रवाशांनी या गाडीच्या मागील बाजूस असलेल्या गार्डच्या डब्याजवळ तिकीटे घेण्यासाठी रांग लावली होती. मात्र, यातील केवळ ५० ते ६० प्रवाशांना तिकीटे मिळाली. तर उर्वरित प्रवाशांना गार्डने तिकीट संपल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी प्रवाशांनी मगआम्ही प्रवास करायचा, टीटीईने पकडले तर आम्ही काय करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार करून, गार्डला तिकीटे देण्याची मागणी केली. मात्र, गार्डने तिकीटचं देण्यासाठी नाही, तर कुठून देणार, असे म्हणत प्रवाशांना तिकीट नसले तरी प्रवास करण्याचे सांगितले.साहेब टीसीने पकडले तर दंड तुम्ही भरा..भोरस स्टेशनवर तिकीटे संपल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या २०० ते २५० प्रवाशांनी एकच गोंधळ केला. या वेळी काही प्रवाशांनी साहेब, गाडीत टीसीने पकडल्यावर आम्ही काय करू, दंड तुम्ही भरणार का, आम्ही टिसीला तुमचेच नाव सांगू, असे म्हणत गार्डला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर काही प्रवाशांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.टीसीने विनातिकीट कारवाई करू नये, म्हणून मी तिकीट काढण्यासाठी गार्डच्या डब्याजवळ गेलो. मात्र, त्यांनी तिकीट संपल्याचे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले. मग त्यांनींच प्रवास करू शकता, असे सांगितल्यावर मी बोरविहीरला जात आहे.- देवा शिंदे, प्रवासी 

या मेमू गाडीला प्रत्येक स्टेशनवरून सरासरी बसणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार तिकीटे दिलेली असतात. मात्र, मंगळवारी जास्त प्रवासी आल्यामुळे ही तिकीटे संपली. त्यामुळे गार्ड ऐनवेळी कुठून तिकीटे आणणार. यापुढे जादा तिकीटे देण्याबाबत चाळीसगाव स्टेशन प्रशासनाला कळविले जाईल.संतोष जाधव, स्टेशन प्रबंधक, धुळे रेल्वे स्टेशन.

तर रेल्वेचेही नुकसान..या मेमू गाडीचे भोरस ते बोरविहीर १५ रूपये तिकीट आहे. मात्र, २०० हुन अधिक प्रवाशांना तिकीटचं मिळाले नसल्यामुळे, रेल्वेचे तिकीटांपासून मिळणारे आर्थिक उत्पन्नही बुडून आर्थिक नुकसान झाले. जर याच प्रवाशांवर टीटीईने दंडात्मक कारवाई केली असती, तर यातुन रेल्वेचा मोठा महसुल मिळाला असता. मात्र, गाडीत सुदैवानी टीटीई नसल्यामुळे या प्रवाशांवर कारवाई झाली नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेDhuleधुळे