शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धुळे जिल्ह्यात तीन वर्षांपासून मिळाले नाही भोजन अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 15:20 IST

संस्थाचालक व कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

ठळक मुद्देभोजन अनुदान नियमित मिळण्यासाठी तरतूद करावी. कर्मचा-यांना जे तुटपुंजे वेतन दिले जाते. ते दरमहा मिळण्यासाठी त्याचे स्वतंत्र हेड तयार करून दरमहा वेतन मिळावे. कर्मचा-यांचा आकृती बंद तयार करून त्यांना स्वरक्षण द्यावे.जेणे करून ते २४ तास विद्यार्थ्यांचा सांभाळ करणा-या या कर्मचाºयांचा संसार थोड्या प्रमाणात का असे ना व्यवस्थित चालेल त्याबाबत तरतूद करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील वसितगृहांना भोजन अनुदान मिळालेले नाही. परिणामी, वसितगृह चालवितांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वसतिगृहांना नियमित भोजन अनुदान द्यावे, यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी संस्थाचालक व कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की शासनाच्या  सामाजिक न्याय विभागामार्फत स्वयंसेवी संस्थेअंतर्गत इ. स. १९५१ सालापासून १०० टक्के अनुदानित एकूण २ हजार ३८८ वसतिगृहे चालविली जातात. त्या वसतिगृहात २४ तास काम करणारा कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करित आहेत. तसेच शासकीय व आश्रमशाळेत काम करणाºया कर्मचाºयांना १०० टक्के अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांना वेठबिगारी पेक्षाही अगदी तुटपुंजे मानधन दिले जात आहे. ही तफावत दूर करण्यासाठी कर्मचाºयांचे २० ते २५ वर्षापासून शासनाकडे संघर्ष सुरू आहे. परंतु, आजपर्यंत  कर्मचाºयांना वेतनश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. तरी शासकीय व वसतिगृहे व वि. जा. भ.ज. च्या आश्रमशाळेचे वसतिगृहे यांना मिळणारी वेतनश्रेणी व १०० टक्के अनुदानित मागासवर्गीय वसतिगृहातील कर्मचाºयांना मिळणाºया मानधनाची तफावत दूर करून वेतनश्रेणीची तरतूद करावी. तसेच शासकीय वसतिगृहे व आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे सोयी-सुविधा दिल्या जातात. त्याचप्रमाणे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. जेणे करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावेल त्यासाठी तरतूद करावी. यावेळी वसतिगृह संस्थाचालक महासंघाचे मनोहर पाटील, विजय पाटील, मनोहर भदाणे, मनोज गोसावी, रवींद्र देवरे, मधुकर पवार, मनोहर पाटील, महारू गुंजाळ, संजय जगताप, लतीश पाटील, अरविंद शिरसाठ, जितेंद्र गिरासे, लता पाटील, मंगलदास भवरे, भूषण देवरे, उज्ज्वल बोरसे, कर्मचारी महासंघाचे भरत राजपूत, पवन पाटील, राधेश्याम पाटील, प्रल्हाद मोरे, योगेश पाटील, भूपेंद्र पाटील, उत्तम गवळी, योगेश मोरे, किरण नेरकर, किरण देवरे, प्रकाश गुजर, संतोष गोसावी, मुकेश पिंपळे, विकास सूर्यवंशी, संजय सरदार, भटाबाई कुवर, बेबी वळवी, लता पवार, युवराज बागुल, रोहिदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

तुटपुंजे मिळते भोजन अनुदान वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जे भोजन अनुदान दिले जाते. ते अगदी तुटपुंज्या प्रमाणात दिले जाते. त्याच भोजन अनुदानात इतर खर्च ही करावा लागतो. तरी भोजन अनुदान वाढविण्याची तरतूद करण्यात यावी. मात्र, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून भोजन अनुदान मिळालेले नाही. वसतिगृह चालविताना अनेक समस्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.