शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

धुळे विभागाला पंढरपूर यात्रेतून १ कोटीचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 11:36 IST

गेल्यावर्षापेक्षा यावेळी २३ लाखांनी उत्पन्न वाढले

ठळक मुद्देपाच दिवस जादा गाड्या सोडल्या६४ हजार प्रवाशांनी घेतला लाभगतवर्षापेक्षा मिळाले उत्पन्न जास्त

आॅनलाइन लोकमतधुळे : आषाढी एकादशीनिमित्त धुळे विभागातर्फे पंढरपुरसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या माध्यमातून धुळे विभागाला तब्बल १ कोटी ९ लाख ८८ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षापेक्षा यावेळी २३ लाखांनी उत्पन्न वाढले आहे.विठू नामाचा गजर करीत पालखी-पायी दिंडीत सहभागी होऊन अनेक भाविक ३०० ते ३५० किलोमीटरचा पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करीत असतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून विठूमाऊलीच्या चरणी नतमस्तक होत असतात.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून हजारो भाविक ‘पांडुरंगा’च्या दर्शनासाठी जात असतात. भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आले होते. यावर्षी ७ ते १३ जुलै असे पाच दिवस धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, शिंदखेडा, नवापूर, व दोंडाईचा या आठ आगारातून बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या.धुळे विभागातर्फे २०० बसेसद्वारे ४५० फेºया करून त्याद्वारे विभागाला १ कोटी रूपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.दरम्यान या जादा बसच्या माध्यमातून तब्बल ६४ हजार भाविकांनी प्रवास केला. त्या माध्यमातून विभागाला १ कोटी ९ लाख ८८ हजाराचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली.मात्र या जादा बसेस सोडत असतांना ग्रामीण भागातील काही मार्गावरील बसफेºया तूर्त रद्द करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Dhuleधुळे