शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

धुळे शहरात होेतेय पाण्याची नासाडी धुळे : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ ...

धुळे शहरात होेतेय पाण्याची नासाडी

धुळे : जलवाहिन्यांच्या गळतीमुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत आहे. वलवाडीसह शहरातील बहुतांश भागात आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचे नियोजन तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे असले, तरी तांत्रिक कारणामुळे अनेक भागात वेळेत पाणीपुरवठा होत नाही. त्यातच शहरातील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे सातत्याने पाण्याची नासाडी होत असते.

जमनागिरी रोड भागात घाणीचे साम्राज्य

धुळे : येथील जमनागिरी रोडवरील शासकीय वसाहत, कारागृह कर्मचाऱ्यांच्या वसाहत आणि इतरही वसाहतींमध्ये स्वच्छतेची गरज आहे. शहरातील जिल्हा कारागृहाच्या कर्मचारी वसाहतीत मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढले असल्याने त्याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण अधिक असल्याने वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था

धुळे : जिल्ह्यातील ९ उपकेंद्रांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या इमारती पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य उपसंचालकांना प्रस्ताव पाठवला आहे. जिल्ह्यात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी काही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. काही केंद्रांच्या इमारतींना गळती लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने आरोग्य केंद्राच्या १२ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले.

धुळ्यातील रस्त्यावर कचरा पडून

धुळे : शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वसाहतींमधील कचरा उचलला जातो; मात्र काही ठिकाणी अजूनही रस्त्यावरच कचरा टाकला जातो. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा कचरा नियमित उचलण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांनी केलेली आहे.

नागपूर-सुरत महामार्ग कामाला गती

धुळे : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने फागणे ते नवापूर प्रलंबित १४० किलोमीटरच्या महामार्ग चाैपदरीकरणाला सुरुवात केली आहे. या कामाची अत्याधुनिक यंत्राद्वारे दर्जा तपासणी केली जात आहे. या तपासणीमुळे यापूर्वीचा रस्ता आणि आताचा रस्ता याबाबतचे वास्तव समोर येणार आहे. तसा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.