शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

जम्बो कॅनाॅलद्वारे हरण्यामाळ, नकाणे तलाव भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST

धुळे : धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून जम्बो कॅनाॅलद्वारे पाणी सोडून हरण्यामाळ आणि नकाणे तलाव भरण्याची मागणी ...

धुळे : धुळे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून जम्बो कॅनाॅलद्वारे पाणी सोडून हरण्यामाळ आणि नकाणे तलाव भरण्याची मागणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केली आहे.याबाबत कदमबांडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, अत्यल्प पावसामुळे सन २००२ प्रमाणे भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अक्कलपाडा प्रकल्पातून हरण्यामाळ व नकाणे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. त्यासाठी पावसाळ्यातच हे तलाव भरण्याची आवश्यकता आहे. कारण उन्हाळ्यात पाणी सोडले तर पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यात कालव्याद्वारे पाणी आणणे जिकीरीचे होईल. सद्यस्थितीत अक्कलपाडा प्रकल्पात ३५ टक्के जलसाठा झाला आहे. धुळे शहराच्या नागरिकांवर पुढील काळात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून जम्बो कॅनाॅलद्वारे पाणी सोडून हरण्यामाळ आणि नकाणे तलाव भरण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.