शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पाऊस होऊनही कांदे लागवडीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:09 PM

मालपूर परिसर : मुख्य पीक असूनही पूर्वतयारीच्या काळातील पाणीटंचाईचा विपरित परिणाम

मालपूर : यंदा शिंदखेडा तालुक्यात मालपूरसह ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. जोरदार पावसामुळे पुन्हा मूग पीक घेऊन त्या क्षेत्रावर मोठ्या आशेने कांदा लागवड सुरू आहे. तर काही गावाच्या क्षेत्रात या पिकावर कीटकनाशक फवारणी व रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. लागवडीवेळी असलेल्या पाणीटंचाईचा विपरित परिणाम लागवडीवर झाला असून त्यात घट झाली आहे.मालपूरसह संपूर्ण परिसरात कांदा शेतकºयांचे मुख्य पीक आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात कांद्याची लागवड पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच्या पाणीटंचाईमुळे कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे. २० जुलैनंतर झालेल्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र कांदा लागवडीसाठी खूप आधीपासून नियोजन करावे लागते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी कांदा रोप टाकावे लागते. त्यानंतर महिना-सव्वा महिन्यानंतर कांदा रोपांची मजुरांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतांमध्ये लागवड करण्यात येते. मात्र यंदा या काळात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने शेतकºयांना रोपे टाकता आली नाहीत. परिणामी कांदा लागवड घटली आहे.बहुतांश शेतकºयांनी दूर अंतरावरून रोपे आणून कांदा लागवड केली. तर काही शेतकºयांची तयारी नसल्याने त्यांच्याकडून लागवडीचे काम अद्याप सुरू आहे. कांदा पिकाने परिसरातील अनेक शेतकºयांची प्रगती झाली आहे. मात्र बºयाच वेळा बाजारात घेऊन गेलेला माल अत्यल्प दरामुळे तेथेच सोडून शेतकºयांना घरी परतावे लागल्याची अनेक उदाहरणे स्वत: शेतकरी सांगतात. त्यामुळे कांदा लागवड म्हणजे एकप्रकारे जुगार असल्याचे प्रत्ययास येते. गेल्या वर्षी शेतकºयांना या पिकांच्या उत्पन्नात मोठा तोटा झाला होता. मध्यप्रदेश राज्यातील इंदूर व नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील बाजार समित्यांत येथील शेतकºयांनी मातीमोल भावाने कांदा विक्री केली होती. तेव्हा २ ते ६ रूपये प्रतिकिलोने कांदा विक्री झाला होता. शेतकºयांच्या आंदोलनानंतर राज्यात विक्री झालेल्या कांद्यास सरकारकडून अनुदान प्राप्त झाले. मात्र इंदूर तसेच नंदुरबार येथे कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना या अनुदानाचा लाभ न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली.मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून शेतकºयांनी नव्या उमेदीने व अपेक्षेने कांद्याची लागवड केली आहे. सध्या दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. एवढा जरी भाव मिळाला तरी येथील शेतकरी समाधानी राहतील. परंतु शेतकºयांचा कांदा बाजारात दाखल होतो तोपर्यंत हा भाव टिकून रहावा, अशी आशा शेतकºयांनी व्यक्त केली.सध्या परिसरात सर्वत्र कांदा लागवडीसह काही शेतकºयांची मशागत, कीडनाशक फवारणी, खते देण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे