शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ...

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता योग्य निर्णय आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक पुन्हा एकदा तुटणार आहे. शासनाने याबाबत ठोस उपाययोजना काय याबद्दल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

-कैलास जैन, चेअरमन हस्ती स्कूल दोंडाईचा

सुरक्षित निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दहावी-बारावीचा परीक्षा होणे गरजेचे असले तरी त्या सुरक्षित वातावरणात होणे त्याहून जास्त गरजेचे आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, प्रशासन व पालकांना सोयीचे होईल. हिमांशू शाह, चेअरमन रोटरी इंग्लिश स्कूल, दोंडाईचा

दडपण आले असते

आजच्या विपरीत परिस्थितीत बरेच विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक कोरोना बाधित आहेत. ऑनलाइन अभ्यास जेमतेम ३०-४० टक्के झाला आहे. परीक्षा आता घेतल्याचे असत्या तर विद्यार्थी व शिक्षक यांचा मनावर दडपण आले असते. प्राचार्य डी. एन. जाधव, दोंडाईचा

आतापासून अंदाज घ्यावा

कोरोनाच्या परिस्थितीत दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे स्वागत आहे. पुढे कशी परिस्थिती राहील याचा अंदाज आज घेणे मुश्किल असले तरी याबाबत आतापासूनच नियोजन असण्याची गरज आहे.

प्राचार्य शरद शर्मा, दोंडाईचा

विद्यार्थ्यांना वेळ मिळेल

कोविड-१९ची स्थिती लक्षात घेऊन शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शासनाचा हा अगदी योग्य निर्णय आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरेसा वेळ मिळणार आहे. -महेश मुळे, धुळे

परीक्षेची टांगती तलवार कायम

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी, दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सततच्या अभ्यासामुळे पठारावस्था येण्याची भीती निर्माण झाली आहे. परीक्षेच्या दडपणाची टांगती तलवार अजून कायम राहणार आहे. या विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाचा ताणातून तूर्त तरी मुक्त होता येणार नाही.

प्राचार्य डी. एन. पाटील, साक्री

सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा

१०वी व १२वीची परीक्षा विद्यार्थ्यांचं करियर ठरविणाऱ्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाचा बोजवारा उडाला आहे. शिक्षक असो वा विद्यार्थी या मुख्य घटकांना विश्वासात न घेता, प्राप्त परिस्थितीचा विचार न करता परीक्षेच्या वेळांत परस्पर बदल करणे कुणाच्याच हिताचे नाही. त्यातून चुकीचा संदेश ही जात आहे. यामुळे परीक्षेचे गांभीर्य ही कमी झाले आहे.

प्राचार्य राजेंद्र अग्रवाल, साक्री