शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ...

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता योग्य निर्णय आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक पुन्हा एकदा तुटणार आहे. शासनाने याबाबत ठोस उपाययोजना काय याबद्दल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

-कैलास जैन, चेअरमन हस्ती स्कूल दोंडाईचा

सुरक्षित निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दहावी-बारावीचा परीक्षा होणे गरजेचे असले तरी त्या सुरक्षित वातावरणात होणे त्याहून जास्त गरजेचे आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, प्रशासन व पालकांना सोयीचे होईल. हिमांशू शाह, चेअरमन रोटरी इंग्लिश स्कूल, दोंडाईचा

दडपण आले असते

आजच्या विपरीत परिस्थितीत बरेच विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक कोरोना बाधित आहेत. ऑनलाइन अभ्यास जेमतेम ३०-४० टक्के झाला आहे. परीक्षा आता घेतल्याचे असत्या तर विद्यार्थी व शिक्षक यांचा मनावर दडपण आले असते. प्राचार्य डी. एन. जाधव, दोंडाईचा

आतापासून अंदाज घ्यावा

कोरोनाच्या परिस्थितीत दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे स्वागत आहे. पुढे कशी परिस्थिती राहील याचा अंदाज आज घेणे मुश्किल असले तरी याबाबत आतापासूनच नियोजन असण्याची गरज आहे.

प्राचार्य शरद शर्मा, दोंडाईचा

विद्यार्थ्यांना वेळ मिळेल

कोविड-१९ची स्थिती लक्षात घेऊन शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शासनाचा हा अगदी योग्य निर्णय आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरेसा वेळ मिळणार आहे. -महेश मुळे, धुळे

परीक्षेची टांगती तलवार कायम

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी, दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सततच्या अभ्यासामुळे पठारावस्था येण्याची भीती निर्माण झाली आहे. परीक्षेच्या दडपणाची टांगती तलवार अजून कायम राहणार आहे. या विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाचा ताणातून तूर्त तरी मुक्त होता येणार नाही.

प्राचार्य डी. एन. पाटील, साक्री

सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा

१०वी व १२वीची परीक्षा विद्यार्थ्यांचं करियर ठरविणाऱ्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाचा बोजवारा उडाला आहे. शिक्षक असो वा विद्यार्थी या मुख्य घटकांना विश्वासात न घेता, प्राप्त परिस्थितीचा विचार न करता परीक्षेच्या वेळांत परस्पर बदल करणे कुणाच्याच हिताचे नाही. त्यातून चुकीचा संदेश ही जात आहे. यामुळे परीक्षेचे गांभीर्य ही कमी झाले आहे.

प्राचार्य राजेंद्र अग्रवाल, साक्री