शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

शेती खातेफोडअभावी अपात्रतेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:14 IST

शेतकरी सैरभैर : पंतप्रधान शेतकरी योजनेंतर्गत सरकारनेच तोडगा काढण्याची मागणी

साक्री : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यात नव्हे तर राज्यात अनेक शेतकऱ्यांची जमिनीची अद्याप खाते फोड झालेली नाही. त्यामुळे कुटुंब जरी विभक्त असले तरी शेती मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर असल्याकारणाने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत.सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकºयांना कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकºयांना दर वर्षी सहा हजार रुपये इतका निधी मिळणार आहे यासाठी तालुक्यातील महसूल स्तरावर शेतकºयांची माहिती जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्धही करण्यात आली आहे.परंतु अनेक गावांमध्ये पूर्वापार शेतकºयांच्या जमिनीची खातेफोड न झाल्याने किंवा अतिशय किचकट प्रकरण असल्याकारणाने अनेक शेतकरी खातेफोड करण्यापासून लांबच राहिले आहेत. तर काही शेतकºयांच्या आजोबा-पणजोबांच्या नावावर आजही जमिनी आहेत. कुटुंबाचा प्रचंड विस्तार झालेला असून कुटुंबातील अनेक सदस्य मयत झाले आहेत. त्यामुळे खातेफोड करण्यास शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.मोठ्या कुटुंबांमध्ये कौटुंबिक सदस्यांमध्येच मतभेद असल्याकारणाने शेतजमिनीची खाते फोड होऊ शकत नाही किंवा अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या नावावरच शेत जमिनी आहेत. यामुळे सातबारा उताºयावर जमिनीचे प्रमाण दोन हेक्टरपेक्षा अधिक असल्याने शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.काही शेतकºयांच्या वाट्यास एक एकर पेक्षाही कमी जमीन आहे. परंतु त्याच्या सातबाºयावर कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे लागलेली आहेत. भावा-भावांची तोंडी वाटणी झाल्यावरही सातबारा उताºयावर मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर जमीन दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरीही सैरभैर झालेले आहेत यासाठी शासनाने योग्य तो पर्याय काढून अशा वंचित शेतकºयांनाही लाभ मिळायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.ज्या शेतकºयांच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असेल आणि त्यात त्याच्या इतर भावांचाही वाटा असेल अशा शेतकºयांची व जमिनीची फोड करून त्यांनाही लाभ देण्यात यावा, त्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे

टॅग्स :Dhuleधुळे