शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

शेतात पाणी शिरुन पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:23 IST

मालपूर : कालव्यांची दुरुस्ती न करता अमरावती प्रकल्पातून पाणी सोडल्याचा आरोप

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर कालव्याची दुरुस्ती केली असती तर शेतकºयांचे नुकसान टळले असते. आता झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकºयांनी केला आहे.१४ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाला. मात्र, १० सप्टेंबरपर्यंत पाण्याची पातळी २२४.४५ मीटर एवढी ठेवावी लागत असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. यासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पाणी शेतात झिरपल्याने मालपूर, सुराय, मांडळ, खर्दे येथील शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावला जाण्याची भिती निर्माण झाली आहे. या प्रकल्पाला सुमारे ७ कि.मी. डावा व १४.२० कि.मी. उजवा कालवा असून याद्वारे मेथी, विखरण आणि कामपूर येथील पाझर तलाव भरण्याची तरतूद आहे. मालपूर ग्रामस्थांनी विखरण पाझर तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला होता. यासाठी ठिय्या आंदोलनही केले होते. मात्र, २७ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे व विखरणचे सरपंच महेंद्र पवार यांनी कालव्याच्या गेटचे पूजन करुन पाणी सोडले.डाव्या व उजव्या कालव्यात प्रचंड काटेरी वृक्ष वाढले असून हेडरेग्युलेटरची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी मातीचा बांध फुटलेला आहे. तसेच कालव्यात प्रचंड मातीचे ढिग आहेत. यामुळे कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष करुन घाईगडबडीने हे पाणी सोडल्यामुळे शेतकºयांच्या कंबरेएवढ्या कापूस पिकात पाणी साचू लागल्यामुळे सर्व पिकच वाया जाणार आहे. काही ठिकाणी कापूस आपोआप पाण्यामुळे मुळासकट उखडून निघाले आहे. काही ठिकाणी भुईमूग, मूग आदी शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.विखरण पाझर तलाव भरण्यासाठी सोडण्यात आलेले हे पाणी अद्याप तिथे पोहोचलेले नाही. खर्दे, मांडळ येथील लेंढुर नाल्यामध्ये गळती लागल्यामुळे या नाल्याने नदीचे नदीचे स्वरुप धारण केले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. फरशीवरुन पाणी वाहत असल्यामुळे खर्दे, मेथी, वरझडीकडे जाणारा रस्ता बंद झाला असून यामुळे रस्त्याची देखील दुरवस्था होणार आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत करत आहे. विखरण तलावातही पाणी पोहचत नाही व खर्दे ते मालपूर दरम्यान प्रचंड शेती पिकांचे नुकसान होत आहे. तरी पाणी सोडण्याचा एवढा हट्टाहास का, असा सवाल येथील नागरिकांकडून  व्यक्त होत आहे. अगोदर कालव्याची दुरुस्ती करावी व नंतर पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.या सोडलेल्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून पाण्याची पातळी समान ठेवण्यासाठी हे पाणी अमरावती नदीत सोडावे व शेतकºयांचे पिक वाचवावे, अशी मागणी मालपूरसह परिसरातील शेतकºयांनी केली आहे.अमरावती प्रकल्पाच्या नादुरुस्त उजव्या कालव्यामुळे माझ्या शेतात पाणी पाझरुन दोन एकराच्या वर कापूस पिक वाया गेले आहे. याला जबाबदार कोण, भरपाई कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अगोदर पाट दुरुस्ती करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, आमचे ऐकून घेतले नाही, घाईगडबडीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी त्वरित बंद  करण्यात यावे व प्रथम पाटचारी दुरुस्त करावी आणि मगच पाणी सोडावे.झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्विकारुन पाटबंधारे विभागान भरपाई द्यावी-बापू रामचंद्र पाटील, शेतकरी मालपूरशेती पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे पाणी कमी केले आहे. मांडळजवळ नाल्यावर गळती लागली आहे. यामुळे मेथी, खर्दे, वरझडी रस्ता काल बंद होता. प्रकल्पात पातळी वाढल्यास अमरावती नदीत पाणी सोडण्यात येईल. -प्रशांत खैरनार, अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती प्रकल्प, मालपूर

टॅग्स :Dhuleधुळे