शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाटचारी फुटल्याने आवर्तन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:29 IST

शेतक-यांना रब्बीची चिंता : धरण बचाव संघर्ष समितीतर्फे पाचटचारी दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : मालनगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी २९ नोव्हेंबरला सोडले होते. यासाठी लोकमतनेच पाठपुरावा केल्यामुळेच आवर्तन सोडण्यात आले होते. पहिल्या आवर्तनाला साधारण एक महिना लागतो. मात्र सातव्या दिवशीच पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटल्याने पाणी बंद झाले. आता पाटचारीचा भराव केव्हा होतो, केव्हा पाणी सुटेल. रब्बी हंगाम वाया जाईल का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटचारी का फुटली? याबाबतही शेतकºयांमध्ये शंका व्यक्त होत आहे.मालनगाव धरण ४०० एमसीएफटीचे आहे. रब्बी हंगाम ३१ आॅक्टोबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. आता दीड महिना उशिरा हंगाम सुरू होत आहे. शेतकरी रब्बी पिकासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. मात्र शाखा अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. पाट दुरुस्तीसाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आमदार डी.एस. अहिरे यांनी पाटदुरुस्तीसाठी जेसीबी मशिन उपलब्ध करुन दिले होते. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शहापुरे यांच्याशी संपर्क साधून प्रस्तुत प्रतिनिधीने वरील अडचण सांगितली. त्यांनी शाखा व उपअभियंता यांना बोलवून अडचण समजून घेतली व तात्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र शेतकºयांना रब्बी पिकाला पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे प्रशासन चालढकल करीत होते. पण शेतकºयांची व्यथा ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. अखेर २९ नोव्हेंबरला रब्बी हंगामाला पाणी सोडले. ५०० पेक्षा जास्त शेतकºयांनी पाणी अर्ज भरले. रब्बीची पेरणी तयार केली. काहींनी प्रत्यक्ष रब्बी पिकाची पेरणीही केली. १० ते १५ टक्के पहिल्या आवर्तनाचे पाणी भरले. तेवढ्यात सात डिसेंबरला रात्री धरणापासून ६५० मीटर अंतरावर पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटली, रात्रीतून ४० ते ५० क्यूसेस पाणी नदीत वाहून गेले. सकाळी पाटबंधारे विभागाने पाटचारीतून पाणी बंद केले. आता पाट दुरुस्तरीसाठी निधी मागणी अहवालाचे कागदी घोडे नाचवून पाणी केव्हा सुटेल हे सांगता येत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतातूर झाला आहे.शेतकºयांमध्ये अशीही चर्चा आहे की, पाटचारीला भगदाड कसे पडले याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण वीज वितरण कंपनीचा मेन लाईनला साक्रीजवळ कावठे शिवारात बिघाड झाला तो सापडायला व विद्युत पुरवठा शेतकºयांना मिळायला २४ तास लागले. हा योगायोगच आहे का? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाटबंधारे अधिकाºयांनी तात्काळ दखल घ्यावी व फुटलेली पाटचारी दुरुस्तीची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे