शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

पाटचारी फुटल्याने आवर्तन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:29 IST

शेतक-यांना रब्बीची चिंता : धरण बचाव संघर्ष समितीतर्फे पाचटचारी दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : मालनगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी २९ नोव्हेंबरला सोडले होते. यासाठी लोकमतनेच पाठपुरावा केल्यामुळेच आवर्तन सोडण्यात आले होते. पहिल्या आवर्तनाला साधारण एक महिना लागतो. मात्र सातव्या दिवशीच पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटल्याने पाणी बंद झाले. आता पाटचारीचा भराव केव्हा होतो, केव्हा पाणी सुटेल. रब्बी हंगाम वाया जाईल का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटचारी का फुटली? याबाबतही शेतकºयांमध्ये शंका व्यक्त होत आहे.मालनगाव धरण ४०० एमसीएफटीचे आहे. रब्बी हंगाम ३१ आॅक्टोबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. आता दीड महिना उशिरा हंगाम सुरू होत आहे. शेतकरी रब्बी पिकासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. मात्र शाखा अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. पाट दुरुस्तीसाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आमदार डी.एस. अहिरे यांनी पाटदुरुस्तीसाठी जेसीबी मशिन उपलब्ध करुन दिले होते. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शहापुरे यांच्याशी संपर्क साधून प्रस्तुत प्रतिनिधीने वरील अडचण सांगितली. त्यांनी शाखा व उपअभियंता यांना बोलवून अडचण समजून घेतली व तात्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र शेतकºयांना रब्बी पिकाला पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे प्रशासन चालढकल करीत होते. पण शेतकºयांची व्यथा ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. अखेर २९ नोव्हेंबरला रब्बी हंगामाला पाणी सोडले. ५०० पेक्षा जास्त शेतकºयांनी पाणी अर्ज भरले. रब्बीची पेरणी तयार केली. काहींनी प्रत्यक्ष रब्बी पिकाची पेरणीही केली. १० ते १५ टक्के पहिल्या आवर्तनाचे पाणी भरले. तेवढ्यात सात डिसेंबरला रात्री धरणापासून ६५० मीटर अंतरावर पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटली, रात्रीतून ४० ते ५० क्यूसेस पाणी नदीत वाहून गेले. सकाळी पाटबंधारे विभागाने पाटचारीतून पाणी बंद केले. आता पाट दुरुस्तरीसाठी निधी मागणी अहवालाचे कागदी घोडे नाचवून पाणी केव्हा सुटेल हे सांगता येत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतातूर झाला आहे.शेतकºयांमध्ये अशीही चर्चा आहे की, पाटचारीला भगदाड कसे पडले याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण वीज वितरण कंपनीचा मेन लाईनला साक्रीजवळ कावठे शिवारात बिघाड झाला तो सापडायला व विद्युत पुरवठा शेतकºयांना मिळायला २४ तास लागले. हा योगायोगच आहे का? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाटबंधारे अधिकाºयांनी तात्काळ दखल घ्यावी व फुटलेली पाटचारी दुरुस्तीची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे