शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

शिरपूर तालुक्यात पिके बहरली, मात्र धरणांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:39 IST

आतापर्यंत केवळ ३३ टक्के पाऊस, दुबार पेरणीच्या संकटाची धास्ती

ठळक मुद्देशिरपूर तालुक्यात आतापर्यंत ३३ टक्के पाऊसदुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी धास्तावले

सुनील साळुंखे ।आॅनलाइन लोकमतशिरपूर : पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने होत आले तरी तालुक्यात काही परिसरात पिकांना पोषक असा पाऊस झालेला नाही़ नदी-नाले वाहून निघालेले नाहीत़ असे असतांनाही ६९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत़ आतापर्यंत केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून, झिमझिम पावसातही चांगलीच पिके बहरली आहेत़पळासनेर, अर्थे परिसरात सुरूवातीला झालेल्या पावसामुळे नाले वाहून निघालेत, मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारली़ काही भागात झिमझिम पावसाच्या भरोशावर पेरणी करून पिके सुध्दा यंदा चांगलीच बहरली आहे़ मात्र अजून पर्यंत तालुक्यात धो-धो पाऊस झालेला नाही़ या महिन्याअखेर पर्यंत मुसळधार पाऊस न झाल्यास पिकांना मोठ्या फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही़तालुक्यात आजअखेर एकूण सरासरीच्या ३३ टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे़ शिरपूर मंडळात २१६, थाळनेर १००, होळनांथे १०३, अर्थे १६८, जवखेडा २२१, बोराडी १५२, सांगवी १२४ मिमि असा पाऊस झालेला आहे़ सर्वात कमी थाळनेर मंडळात तर सर्वाधिक पाऊस शिरपूर मंडळात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे़यंदा हवामान खात्याने मान्सून वेळेवर होईल, पाऊस भरपूर होईल असा अंदाज वर्तविला होता़ त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात होता़ पाण्याअभावी काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. बियाणे व खते यांच्या अतोनात भाव वाढीमुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.तालुक्यात १६ लहान मोठे धरणे आहेत. यापैकी अनेर, खामखेडा, जळोद,वाडी, गधडदेव, मिटगांव, बुडकी,रोहिणी,विखरण ही धरणे कोरडीठाक पडल्याने चिंतेत भर पडली. 

टॅग्स :Dhuleधुळे