शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

By अतुल जोशी | Updated: September 20, 2022 17:52 IST

रविवारी मध्यरात्री धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, धुळे खेडे, व कुसुंबा या चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली.

धुळे : तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चार महसूल मंडळात ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. दरम्यान नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे अगोदर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यातच शनिवारी व रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पिकाच्या नुकसानीत भर पडलेली आहे.

रविवारी मध्यरात्री धुळे तालुक्यातील आर्वी, बोरकुंड, धुळे खेडे, व कुसुंबा या चारही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. यात आर्वीला सर्वाधिक १५९ मि.मी., बोरकुंडला ११० मि.मी., धुळे खेडे व कुसुंबा येथे ७४.८० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. अतिवृष्टीमुळे या चारही महसूल मंडळात खरिपाच्या जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस व मका पिकाला बसला आहे.

धुळे तालुक्यात एकूण एक लाख ७ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली असून, त्यापैकी ८४ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. अतिपावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने, कपाशीची बोंड काळी पडले असून, यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत. कृषी, महसूल व तलाठी यांच्यामार्फत पंचनामे करण्यात येत आहे.

टॅग्स :floodपूरDhuleधुळेRainपाऊस