शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

865 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

By admin | Updated: September 22, 2015 00:29 IST

शिरपूर तालुक्यात पंचनामे : अतिवृष्टी व वादळी पावसाचा 31 गावांना फटका, धान्य, कापूस, फळपिकांसह भाजीपाल्याची नासाडी

शिरपूर : तालुक्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या वादळी पावसाने उभ्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा प्रत्यय या नुकसानीच्या पंचनाम्यातून आला आहे. तालुक्यातील 31 गावांमधील 865 हेक्टर क्षेत्रात पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्यात बाजरी, ज्वारी या तृणधान्यासह कापूस, फळपिके व भाजीपाला यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने तेथे स्वाभाविक जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्याच्या कामांना गती दिली आहे. तलाठी व कृषी सहायक पाऊस उघडताच शनिवारी दुपारी शेतांवर पोहचले.

शिरपूर तालुक्यात शिरपूरसह थाळनेर, होळनांथे, अर्थे, जवखेडा, बोराडी व सांगवी या मंडळांमध्ये पावसाने थैमान माजविले होते.

शिरपूर तालुक्यात 31 गाव शिवारांमध्ये जाऊन पंचनामे करण्यात आले. त्यात 201 हेक्टरवरील बाजरी, 186 हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, 98 हेक्टर क्षेत्रात फळपिके व 11 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसला असून सुमारे 360 हेक्टर क्षेत्रात या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

सलग तीन दिवस पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीचपाणी झाले. त्यामुळे दोन दिवस कर्मचा:यांना पंचनाम्याची कार्यवाही करता आली नाही. मात्र शनिवारी पावसाने उघडीप देताच महसूल विभागाचे सर्कल, तलाठी तसेच कृषी विभागाचे कृषी सहायक पंचनाम्यासाठी पोहचले. अद्याप काही शेतांमध्ये पाणी साचले असून काही शेतांमध्ये पाणी जमिनीत मुरले, मात्र सर्वत्र चिखल आहे. त्यामुळे तेथे पंचनामे करता येत नसल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात आले. परंतु येत्या दोन-तीन दिवसात तेथील नुकसानीचेही पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. स्वत: तहसीलदार नितीन पाटील कर्मचा:यांना या संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत.