शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

जुलै महिन्यापासून सध्या सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळेच खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लहान ...

जुलै महिन्यापासून सध्या सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळेच खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. राज्यात कोरोनाची तिसऱ्या लाटेत नेमके कोणते लक्षणे कोणती असतील, याबाबत निश्चित माहिती नसल्याने पालकांनी कोणतेही लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावा, डॉक्टरांच्या मते सर्दी-खोकल्याने रोज सुमारे ३० तर डेंग्यू- मलेरियाची लक्षणे घेऊन सुमारे ५ टक्के रुग्ण येत आहे.

ताप आला म्हणजे कोरोना असे नाही,पण.....

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये आढळून येतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्याने कोरोना झाले असे समजू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपल्या परिसरात व घरात सांडपाणी जमा हात असेल तर डेंग्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना भीती दुरू ठेवून डेंग्यू होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एकही लहान मुलाला काेरोना आढळून आलेला नाही. मात्र डेंग्यूवर उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पालकांना मुलांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरिया, जुलाब, अंगदुखी सारखे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.

-अभिनय दरवडे, बालरोगतज्ज्ञ

सर्दी, खोकला, तापाची साथ

सर्दी, खोकला, अंगदुखीचे सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण २५ ते ३० टक्के तर डेंग्यू-मलेरियाने बाधित साधारणत: ४ ते ५ टक्के रुग्ण आहेत.

घाबरू नका, उपचार घ्या

सर्दी-खोकला, अंगदुखी, सांधेदुखीचे रुग्ण वाढत आहेत. लक्षणानुरूप औषधी दिली जाते आहे. संसर्गजन्य तापाचे प्रमाणही वाढले आहे; परंतु यातून फारसे घाबरण्याचे कारण नाही. योग्य उपचार-काळजी अन‌् औषधी घ्यावी. रक्तदाब कमी आधिक झाला तरच रुग्ण दाखल केले जाते

अशी घ्यावी काळजी

गार पाणी व वस्तू टाळाव्यात, पाणी उकळून गार करून प्यावे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळवा.

पाण्यावर डास बसणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याची भांडी झाकून ठेवावी, फ्रीजमागील पाणी काढावे.

लक्षणे आढळल्यावर डॉक्टरांशी संपर्क करावा, वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती करणे आवश्यक आहे.