शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST

त्यातही उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची ...

त्यातही उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे.

मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती. वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड करण्यास घाई केली. बियाणे बऱ्यापैकी उगवले असताना अचानक पडलेला पावसाचा खंड हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

हवामानाचा बदल शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा आहे. आधीच महागडे बियाणे विकत घेऊन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके संकटात सापडली आहेत. नेर परिसरात कापूस, बाजरी, सोयाबीन, मका, तूर आदी मुख्य पिके घेतली जातात. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनचे आगमन होणार, असे भाकित हवामान विभागाने वर्तवले होते. या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केली. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी आता पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे; मात्र ज्या शेतकऱ्यांकडे अशी सोय नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे चातकासारख्या लागल्या आहेत. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास कोरडवाहू शेतातील पिके करपून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.