शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

शिरपूरला चार फे-यांंत होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

१५ रोजी एकूण ७६़३६ टक्के मतदान झाले़ एकूण मतदान ५२ हजार १५४ होते, त्यापैकी ३९ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा ...

१५ रोजी एकूण ७६़३६ टक्के मतदान झाले़ एकूण मतदान ५२ हजार १५४ होते, त्यापैकी ३९ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ बाळदे, भटाणे, बोरगाव, भोरखेडा व बाभुळदे अशा पाच ग्रामपंचायतींमध्ये केवळ एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली़

मात्र, या गावांमध्ये फारसा उत्साह मतदारांमध्ये दिसून आला नाही़ बलकुवे, कुवे, चाकडू, होळ, उप्परपिंड, दहिवद, नटवाडे, जामन्यापाडा, गरताड, भाटपुरा, साकवद, जुने भामपूर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, शेमल्या याठिकाणी आमनेसामने लढती असल्यामुळे मतदारांचा उत्साह दिसून आला़

बिनविरोध ग्रामपंचायत

माघारीअंती घोडसगाव, पिंपळे, वाठोडा, असली, हिंगोणीपाडा व भावेर अशा सहा ग्रामपंचायतींसह १११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत़

३ जागा रिक्त :

बोरगाव येथे ७ जागांपैकी ४ बिनविरोध, २ रिक्त तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते़ बाभुळदे येथे ७ जागांपैकी ५ बिनविरोध, १ रिक्त तर १ जागेसाठी २ जण रिंगणात होते़ बोरगाव व बाभुळदे येथील रिक्त असलेल्या ३ जागेकरिता केव्हा निवडणूक होते, याकडे लक्ष लागले आहे़

४ फे-यांत मतमोजणी

१८ रोजी सकाळी ९ वाजेपासून येथील तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे़ ७ टेबलांवर एकाच वेळी एका गावाचीच मतमोजणी केली जाणार आहे, जेणेकरून मतमोजणी ठिकाणी अधिक गर्दी होणार नाही़ पहिल्या फेरीत शिंगावे, दहिवद, चाकडू, कुवे, जातोडा, साकवद, दुस-या फेरीत नटवाडे, जामन्यापाडा, जवखेडा, शेमल्या, बलकुवे, सावळदे, मांडळ, तिस-या फेरीत जुने भामपूर, उप्परपिंड, कळमसरे, भाटपुरा, होळ, हिंगोणी बु़, वरूळ तर शेवटच्या अंतिम फेरीत बाळदे, बोरगाव, गरताड, बाभुळदे, भटाणे, टेकवाडे, भोरखेडा या गावांची मतमोजणी केली जाणार आहे़ एकूण चार फे-यांत मतमोजणी केली जाणार आहे़

सरपंच आरक्षणाकडे लक्ष

युती सरकारच्या काळात सरपंचपद थेट जनतेतून निवडून दिले जात होते़ आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपद निवडले जाणार आहे़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या़ निवडणूक आयोगाने नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्यात़ ग्रामपंचायतींचे मतदान १५ रोजी झाले़ कदाचित २२ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे़ या सोडतीकडे आता गावपुढा-यांचे लक्ष लागून राहिले आहे़