शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्द करणे हा पर्याय असू शकतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे ...

गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे समजेनासे झालेले आहे. गेल्यावर्षी ॲानलाइन अभ्यासक्रम राबविण्यात आला. मात्र त्यात कोणी किती साध्य केले हा संशोधनाचा विषय आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत समजू शकतो. मात्र दहावीकडे विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणून बघितले जाते. त्यामुळेच विद्यार्थीही जीवापाड मेहनत करून अभ्यास करीत असतात. जास्तीत जास्त गुण मिळवून अकरावीला चांगल्या शाखेत, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा हाच त्यामागचा उद्देश असतो. यावर्षी २९ ए्प्रिलपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या आहेत. मात्र या परीक्षा होणार असल्याने काहीसा दिलासा आहे.

मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सरसकट दहावीच्या परीक्षा रद्द करून टाकल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कसे मूल्यमापन होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अकरावीच्या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे परीक्षा देऊन जास्त गुण मिळविणाऱ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांकनांच्या आधारे गुण मिळाल्यास त्यांना पुढील शाखेत प्रवेश घेण्यास अडचण येऊ शकते. यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असतानाही येथील शासनाने

दहावीच्या परीक्षा उशिराने का होईना त्या घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तसा निर्णय सीबीएसईलाही घेता आला असता. मात्र त्यांनी सरसकट दहावीची परीक्षाच रद्द करून एकप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे असे म्हणण्यास वाव आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली होती. आणि शेवटी परीक्षा नाही होणार म्हटल्यास त्यांच्यातही नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळे सीबीएसईने बारावीची परीक्षा ज्या प्रमाणे तूर्त स्थगित करून नंतर घेण्याचा निर्णय घेतला, तसाच दहावीच्या बाबतीतही निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. अजूनही वेळ गेलेली नाही सीबीएसईने जूनमध्ये नाही तर जुलैमध्ये दहावीच्या परीक्षा घ्याव्यात, पण परीक्षा रद्द करू नये असेही काही पालकांचे म्हणणे आहे. बारावीच्या परीक्षा उशिराने होऊ शकतात, तर दहावीच्या का नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे.