शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

परीक्षा रद्द करणे हा पर्याय असू शकतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे ...

गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे समजेनासे झालेले आहे. गेल्यावर्षी ॲानलाइन अभ्यासक्रम राबविण्यात आला. मात्र त्यात कोणी किती साध्य केले हा संशोधनाचा विषय आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत समजू शकतो. मात्र दहावीकडे विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणून बघितले जाते. त्यामुळेच विद्यार्थीही जीवापाड मेहनत करून अभ्यास करीत असतात. जास्तीत जास्त गुण मिळवून अकरावीला चांगल्या शाखेत, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा हाच त्यामागचा उद्देश असतो. यावर्षी २९ ए्प्रिलपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या आहेत. मात्र या परीक्षा होणार असल्याने काहीसा दिलासा आहे.

मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सरसकट दहावीच्या परीक्षा रद्द करून टाकल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कसे मूल्यमापन होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अकरावीच्या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे परीक्षा देऊन जास्त गुण मिळविणाऱ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांकनांच्या आधारे गुण मिळाल्यास त्यांना पुढील शाखेत प्रवेश घेण्यास अडचण येऊ शकते. यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असतानाही येथील शासनाने

दहावीच्या परीक्षा उशिराने का होईना त्या घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तसा निर्णय सीबीएसईलाही घेता आला असता. मात्र त्यांनी सरसकट दहावीची परीक्षाच रद्द करून एकप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे असे म्हणण्यास वाव आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली होती. आणि शेवटी परीक्षा नाही होणार म्हटल्यास त्यांच्यातही नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळे सीबीएसईने बारावीची परीक्षा ज्या प्रमाणे तूर्त स्थगित करून नंतर घेण्याचा निर्णय घेतला, तसाच दहावीच्या बाबतीतही निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. अजूनही वेळ गेलेली नाही सीबीएसईने जूनमध्ये नाही तर जुलैमध्ये दहावीच्या परीक्षा घ्याव्यात, पण परीक्षा रद्द करू नये असेही काही पालकांचे म्हणणे आहे. बारावीच्या परीक्षा उशिराने होऊ शकतात, तर दहावीच्या का नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे.