शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

परीक्षा रद्द करणे हा पर्याय असू शकतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे ...

गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे समजेनासे झालेले आहे. गेल्यावर्षी ॲानलाइन अभ्यासक्रम राबविण्यात आला. मात्र त्यात कोणी किती साध्य केले हा संशोधनाचा विषय आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत समजू शकतो. मात्र दहावीकडे विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणून बघितले जाते. त्यामुळेच विद्यार्थीही जीवापाड मेहनत करून अभ्यास करीत असतात. जास्तीत जास्त गुण मिळवून अकरावीला चांगल्या शाखेत, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा हाच त्यामागचा उद्देश असतो. यावर्षी २९ ए्प्रिलपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या आहेत. मात्र या परीक्षा होणार असल्याने काहीसा दिलासा आहे.

मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सरसकट दहावीच्या परीक्षा रद्द करून टाकल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कसे मूल्यमापन होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अकरावीच्या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे परीक्षा देऊन जास्त गुण मिळविणाऱ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांकनांच्या आधारे गुण मिळाल्यास त्यांना पुढील शाखेत प्रवेश घेण्यास अडचण येऊ शकते. यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असतानाही येथील शासनाने

दहावीच्या परीक्षा उशिराने का होईना त्या घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तसा निर्णय सीबीएसईलाही घेता आला असता. मात्र त्यांनी सरसकट दहावीची परीक्षाच रद्द करून एकप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे असे म्हणण्यास वाव आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली होती. आणि शेवटी परीक्षा नाही होणार म्हटल्यास त्यांच्यातही नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळे सीबीएसईने बारावीची परीक्षा ज्या प्रमाणे तूर्त स्थगित करून नंतर घेण्याचा निर्णय घेतला, तसाच दहावीच्या बाबतीतही निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. अजूनही वेळ गेलेली नाही सीबीएसईने जूनमध्ये नाही तर जुलैमध्ये दहावीच्या परीक्षा घ्याव्यात, पण परीक्षा रद्द करू नये असेही काही पालकांचे म्हणणे आहे. बारावीच्या परीक्षा उशिराने होऊ शकतात, तर दहावीच्या का नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे.