शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

अवघ्या दोन वेचणीत संपणार कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:48 IST

फरदडची आशाही मावळली : अवकाळी पावसाने फुलफुगडी झटकली, कैऱ्या सडल्या

विंचूर : धुळे तालुक्यात यंदा संततधार पावसाने बाजरी, ज्वारी, मका ही पिके चाºयासह सडून गेली आहेत. तर बहुतांश कापूसही अवघ्या दोनच वेचणीत संपेल, असे विदारक चित्र तालुक्यातील शिरुड, जुनवणेसह जिल्ह्यातील बहुतांश शिवारात आहे.यंदा खरीपात सततच्या पावसाने दसरा सणानंतर आठवडाभर विश्रांती घेतली. मात्र कापसाची आधीची फुलफुगडी गळून पडली. आधी लागवड झालेल्या कपाशीच्या पक्कया कैºया सडल्या, अशी कैफियत कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. यातच आठवडाभरात उन्हाने कपाशी बहरायला पुन्हा प्रारंभ झाला. तोच दिवाळीच्या सुमारास सलग १० दिवस मध्यम ते जोरदार तसेच भिज पावसाने या पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडांची पाने पिवळी पडली, नव्याने आलेली फुलेही बरीचशी झटकून जमिनीवरच पडून सडली. जेमतेम दोन चार कैºया लागलेल्या आहेत. जास्त पाणी साठल्याने त्यामुळे पानांचा रंग पिवळा पडल्याने पुन्हा बहर येणे शक्य वाटत नाही, असे कृषी सहायक पी.ई. लांबोळे यांनी आर्वी, बेंद्रेपाडा येथील पाहणीवेळी सांगितले. दिवाळीनंतर चार ते पाच महिने वेचला जाणारा कापूस पुढील १५ दिवसांत फक्त दोनच वेचणीत संपेल, अशी परिस्थिती आहे. शेतकºयास रोख रक्कम मिळवून देणारे पांढरे सोने चिखलात दडल्याने उत्पन्न लक्षणीय घटणार असल्याचे यातून स्पष्ट होते. मुलांचे शिक्षण, विवाह समारंभ, वृद्ध आईवडिलांवरील उपचार आदी बाबी पूर्ण होणे तर दूर; पण गेल्या तीन वर्षांपासून होणाºया अत्यल्प उत्पन्नाने शेतकरी व मजुरांचे रोजचे जीवन अवघड बनले आहे.धुळे तालुक्यातील शेतकºयांच्या कोरडवाहू व बागायती शेतातील खरीप हंगामात बाजरी, ज्वारी, मका याप्रमाणेच विशेषत: मध्यम ते हलक्या जमिनीतील कापूस पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकरी हतबल ठरला आहे. शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत व कर्जमुक्ती ही अपेक्षित आहे. याबाबत पीकविमा धारक शेतकºयांंनी नुकसानीबाबत सूचना अर्ज विमा कंपनीला शासनामार्फत द्यावा की नाही, या संदर्भात शिरुड, निमगुळसह परिसरातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. सध्या कपाशीबाबत नुकसान अर्ज देण्याचा कुठल्याही सूचना नाहीत. कारण कापूस वेचणीबाबत कृषी, महसूल विभाग व विमा कंपनी आदींचा पीक काढणी प्रयोग, उंबरठा उत्पन्नाचा अंदाज घेतल्यानंतर नुकसानबाबत आढावा घेतला जातो, असे कृषी सहायक सुमित नगराळे यांनी सांगितले. सध्या अनेकांचा कापूस वेचणीवर आला असून त्यात चक्रीवादळाच्या बातम्यांमुळे पाऊस पुन्हा आला तर काय? ह्या भीतीने एकाचवेळी सर्वांना वेचणीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे प्रत्येकी मजुरीचा दरही ५० ते ७० रुपयांनी वाढली, असे शेतकरी कृष्णा बाबूलाल देसले, विनायक देवरे गणेश बोरसे, दिलीप खिवसरा यांनी सांगितले. कपाशीखालील क्षेत्रही नेहमीच अधिक असते. परतीच्या पावसाने या पांढºया सोन्याची हिरवी पाने पिवळी झटकली, वाढ खुंटली, बहर खाली गळून पडला. त्यामुळे फरदड घेता येण्याची शक्यता दिसत नाही. उलट पुढील दोन वेचणीत संपूर्ण कपाशी पीक संपण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग रडकुंडीला आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे