शिरपूर तालुक्यात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ८०६ पर्यंत पोहचली असून त्यात ५०० रूग्णांवर उपचार केले जात आहेत़ ८१ जणांचा बळी गेला असून ४ हजार २२५ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत़ ग्रामीण भागात २ हजार ३१ व शहरी भागात २ हजार ७७५ अशी रूग्ण संख्या आहे़ ग्रामीण भागात २५ व शहरात ५६ असे एकूण ८१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़ ग्रामीण भागात आढळून आलेले २७५ रूग्ण आपआपल्या घरीच तर ५७ रूग्णांवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत़
जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य विभागाची टिम आता कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी कमी पडू लागली आहे़ गतवर्षापेक्षा दुसºया लाटेची परिस्थिती गंभीर झाली असून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर प्रशासनाला पडला आहे़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे या कारणाने आरोग्य विभागावर मोठा ताण आला आहे.
n ग्रामीण व आदिवासी भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत़ मात्र त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे ते रूग्ण दवाखान्यात दाखल होत नाही़
n घरीच ते उपचार करतात़ मात्र असे रूग्ण घरी न थांबता गाव-पाड्यावर फिरतांना दिसत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़
n बाधितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्तरीय कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे़
n त्यात सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, तंटामुुक्त समितीचे अध्यक्ष,आरोग्यसेवक, यांचा समावेश असतांना देखील बाधित रूग्णांवर यांचे नियंत्रण नाही़.
गत काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे़ सकाळपासून उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत़ सध्या चाचण्यांवरही व लसीकरणावर भर देण्यात आला आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसात रूग्णसंख्या कमी होईल़
- डॉ. प्रसन्न कुळकर्णी,
तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरपूर