शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST

धुळे : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदादेखील घटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात २८ ...

धुळे : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदादेखील घटण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात २८ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु, त्यापैकी केवळ २७ हजार ९२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कोरोनासह इतर कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत. २१ हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. बारावीला २४ हजार ५८ विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु, प्रत्यक्षात २३ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यंदादेखील ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा संसर्ग राज्यभर वाढला आहे. धुळ्यातही रुग्णांची संख्या विक्रमी पटीने वाढत आहे. विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता आहे.

येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीसाठी अजून मुदत आहे. विद्यार्थी अर्ज भरत आहेत. त्यामुळे यंदा किती विद्यार्थी परीक्षा देतील हा आकडा आजच सांगणे कठीण आहे. कारण परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षण मंडळाकडून परीक्षार्थ्यांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाते. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत हे आताच सांगणे कठीण आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

नियमित विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी कोरोना आणि लाॅकडाऊनमध्ये कुटुंबाला मदतीसाठी धावल्याने शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर आहेत. पुन्हा काेरोनाचे संकट ओढवले असून, लाॅकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या घटणार आहे. अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमकी आकडेवारी हाती आली नाही.