शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

बंद पाण्याचे आवर्तन पूर्ववत सुरू

By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST

पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले.

धुळे : पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आवर्तन २९ मेस अचानक बंद झाले. यासंदर्भात कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी बचाव संघर्ष समितीने आवर्तने पूर्ववत सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली. त्यानुसार ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले. अक्कलपाडा धरणातील पाणी खरीप हंगामासाठी सैयदनगर कालव्याद्वारे मिळावे यासाठी संघर्ष समितीने पाटबंधारे विभागास सूचित केले होते. रब्बी हंगामात गारपिटीने नेर परिसरातील नेर, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, भदाणे, लोहगड, लोणखेडी येथील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते. अक्कलपाडा धरणात पुरेसा जलसाठा असल्यामुळे खरीप हंगामासाठी पाण्याचे दोन आवर्तन मिळावे, अशी मागणी समितीने पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार २७ मे रोजी पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले. त्यानुसार सदर कालव्याच्या लाभदायक क्षेत्रातील शेतकर्‍यांनी कपाशी लागवड, मका पेरणी व इतर मशागतीसाठी सुरुवात केली. परंतु पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्व सूचना न देता २९ मे रोजी कालव्याचे पाणी बंद केले. त्यामुळे कपाशी लागवड केलेले शेतकरी व इतर पिक पेरणी केलेल्या शेतकर्‍यांचे बी-बियाणे व खते यासाठी खर्च केलेला असताना पाणी बंद केल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. समितीचे अध्यक्ष दिलीप बिरारी, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ व सचिव प्रदीप देसले व शेतकर्‍यांनी कुणाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांची भेट घेतली. त्यांनी कालव्याचे आवर्तन ३० मे रोजी पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिलेत. यामुळे भदाणे, नेर, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराणे, कुसुंबा, चौगाव या गावातील जवळजवळ १५०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.