शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

पुलांची स्थिती..नजर हटी..दुर्घटना घटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:14 IST

शिरपूर : शहरालगत असलेल्या नदीवरील पुलाचे कठडे तुटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शहराजवळील दोन ...

शिरपूर : शहरालगत असलेल्या नदीवरील पुलाचे कठडे तुटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहराजवळील दोन तर राज्य महामार्ग शिरपूर-शहादा महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरील कठडे, सुरक्षित गार्ड तुटलेले असल्याने वाहन धारकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी लहान पुलांवर कठडेच बसविलेले नसल्याने अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत़शिरपूर शहरालगत असलेल्या आमोदे गावाकडे जाणारा रस्त्यावरील अरूणावती नदीवर लहान पूल बांधण्यात आला आहे़ जेव्हा-जेव्हा या नदीला महापूर आला, त्या-त्यावेळी या पूलाचे कठडे वाहून गेले आहेत़ गेल्या वर्षी देखील या नदीला महापूर आल्यामुळे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलावर वाहून गेलेले कठडे नव्याने बसविण्यात आलेले नाहीत़ मात्र याच पूलाशेजारी मोठा पूल करण्यात आल्यामुळे त्या पूलावरून देखील अधिक वर्दळ असते़ असे असले तरी या पूलाचे कठडे बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे़ लहान पूलावरून देखील नेहमीच वाहनांची वर्दळ असते़तसेच शहरातील खंडेराव मंदिराजवळील अरूणावती नदीवर उंटावद गावाकडे जाणारा पूलाचे देखील कठडे महापूरामुळे वाहन गेले आहेत़ गेल्या ९ आॅगस्टला आलेल्या पूरामुळे नेहमीप्रमाणे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलाला पुन्हा कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ याच नदीवर पुन्हा बाळदे गावाजवळ तिसरा पूल बांधण्यात आलेला आहे़ याही पूलाची परिस्थिती तशीच आहे़गेल्या वर्षी नदी-नाल्यांना आलेल्या महापूरामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील पुलाचा भराव, पुलाचे कठडे वाहून गेले तर रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेल्यामुळे त्या रस्त्यावर ये-जा करणे धोकेदायक ठरू लागले आहे़ शहरातील अरूणावती नदीला आलेल्या महापूरामुळे देखील शिरपूर-उंटावद गावाला जोडणारा पूलाच्या वरपर्यंत पाणी वाहिले होते, त्यामुळे या पुलाचा भराव वाहून गेला होता़ त्यामुळे काही दिवस रहदारीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता़ मात्र नागरिकांचे हाल होवू लागल्यामुळे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तातडीने तो भराव बुजून टाकल्यामुळे रहदारी पुर्ववत सुरू करण्यात आली होती़