शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, १३ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !धुळे शहरात शुध्द पाणी : ग्रामीणमध्ये २० नमुने दूषित, उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

धुळे : जिल्ह्यातील १३ गावांचे २० पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले असून हे पाणी आजाराचे कारण ठरू ...

धुळे : जिल्ह्यातील १३ गावांचे २० पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले असून हे पाणी आजाराचे कारण ठरू शकते. त्यामुळे आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणांनी जलशुध्दीकणाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी मे, जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या पथकांनी पाण्याचे नमुने तपासले आहेत.

त्यात धुळे तालुक्यात २५९ नमुने तपासले असून सडगाव येथे २, हेंकळवाडीला २, मोरशेवडी २, जुन्नेर २, गोंदूर ३ असे ११ पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य आले आहेत. साक्री तालुक्यात ३०९ नमुने तपासले असून खैरखुटा येथे २, उमरपाटा (आंबुर), खांडबारा, मचमाळ, जामखेल येथे प्रत्येकी एक असे एकूण ६ नमुने पिण्यासाठी अयोग्य आले. शिदखेडा तालुक्यात १३४ नमुन्यांपैकी होळ, दसवेल, निरगुडी येथील नमुने अयोग्य आले आहेत. तर शिरपूर तालुक्यात २१३ पाणी नमुने तपासले होते. ते सर्वच्या सर्व पाणी नमुने योग्य आले आहेत. शिरपूर तालुक्यात पिण्यासाठी शुध्द पाणी मिळत आहे.

धुळे शहरात शुध्द पाणीपुरवठा

धुळे शहरात सर्वच भागांमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. जून महिन्यात पालिकेच्या पाणी नमुने तपासणी पथकाने विविध भागात नळांना येणारे पाणी आणि जलकुंभातील पाण्याचे ११० नमुने तपासले होते. त्यापैकी सर्व नमुने पिण्यासाठी योग्य आले आहेत. एकही पाणी नमुना दूषित आला नसल्याचे सांगण्यात आले. जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा योग्य आहे. पाण्याचे हे नमुने पावसाळ्याच्या आधी जून महिन्यात घेतले होते. त्यांची तपासणी झाली आहे.

जलजन्य आजारांचा पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या नंतर पाण्याचे नमुने तपासले जातात.

जलशुध्दीकरण केंद्रावरून शुध्द पाण्याचा पुरवठा होत असला तरी जलवाहिनी फुटल्यास पाणी दूषित होऊ शकते.

कोरोनामुळे नमुने घटले नाहीत

nकोरोनाचा संसर्ग असला तरी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण घटलेले नाही. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संबंधित विभागाने पाण्याचे नमुने घेतले. कोरोनाचा संसर्ग असल्याने पिण्याच्या पाण्याच्या विषयाला जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

nजिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काही ठराविक गावांची निवड करून पाणी नमुने तपासले जातात. पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळल्यास उपाययोजना सुचविल्या जातात.

nपिण्यासाठी अयोग्य पाणी आढळून आल्यास जलस्त्रोतांचे शुध्दीकरण केले जाते.

n संबंधित ग्रामपंचायतींना तशा सूचना देऊन प्रशिक्षण तसेच आवश्यक साहित्य पुरविले जाते.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !

nधुळे शहरासह जिल्ह्याने कोरोनाच्या दोन लाटांमध्ये कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. त्यामुळे आरोग्याचे महत्त्व पटले आहे.

nकोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी पावसाळा लागल्याने जलजन्य आजारांची शक्यता बळावते.

nशुध्द पाण्याचा पुरवठा होत असला तरी पावसाळ्यात पाणी उकळून प्याले तर जलजन्य आजार टाळता येतात.

n धुळे शहरासह जिल्ह्यात अजुनपर्यंत तरी डायरियाचे रुग्ण आढळून आले नाहीत.

nनागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि आरोग्य सांभाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

ज्या गावात तपासणीच झाली नाही त्यांचे काय ?

जिल्ह्यात प्रातिनिधिक स्वरूपात काही ठरावीक गावांमध्ये पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यात जलस्त्रोतांचादेखील अभ्यास केला जातो. सर्वच गावांचे पाणी नमुने तपासले जात नाहीत.

त्यामुळे ज्या गावात तपासणीच झाली नाही त्या गावांच्या सार्वजनिक आरोग्याचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतात. त्यांचा हा प्रश्न रास्त आहे.

शिवाय दरवर्षी त्याच त्या गावांमध्ये पाण्याची तपासणी होते. इतर गावांमध्येदेखील तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. आरोग्याच्या तक्रारी आल्यास इतर गावांमध्ये तपासणी केली जाते.