शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

उमेदवारांनी संक्रांतीला गोड गोड बोलून मागितली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहिल्या टप्प्यात ...

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहिल्या टप्प्यात उमेदवार व त्याच्या समर्थकांनी गावातील प्रत्येक वॉर्डावॉर्डात जाऊन जाऊन प्रचाराची मोहीम राबविली होती. मात्र प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना पॅनलप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारत प्रचाराची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर अनेक गावांमध्ये उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शनाचे दर्शन घडविले.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची मुदत संपली होती. शुक्रवारी मतदान असल्याने, उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना एक दिवसाचा अवधी मिळाला होता. त्यातच गुरुवारी मकरसंक्रांत हा वर्षातील पहिल्या सणाची पर्वणीच्या संधीचा सदुपयोग करून घेतला. अनेकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत छुप्या पद्धतीने प्रचार केला. मात्र यात आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान ग्रामीण भागात निवडणुकीमुळे रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असल्याचे दिसून आले.