शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

‘अक्कलपाडा’ पायथ्याशी वारंवार मानव व हिंस्त्रप्राण्यांचा संघर्ष सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 11:59 IST

म्हसदी, चिंचखेडा परिसर । मानवावर बिबट्याचा हल्ला तर पाळीव प्राणी फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथे अक्कलपाडा धरणाच्या पायथ्याशी असलेले हे गाव या गावालगत सध्या हिंस्र प्राण्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. या गावामध्ये तीन बिबट्या माद्यांनी आठ ते दहा बछड्यांना जन्म दिला असल्याचे याबाबत ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत वनविभागाने खबरदारीने पावले उचलावि. वन्य प्राण्यांचा मोठा वावर वाढल्यामुळे वारंवार मनुष्य व हिंस्त्रप्राणी यांचा संघर्ष सुरुच आहे.गेल्या आठ दिवसांपूर्वी माधव पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला तर रमेश बच्छाव यांच्या विहिरीत बिबट्याचा मृत्यू पावल्याची घटना घडली. अनेक जणांचे गोºहे तर अनेकांच्या शेळ्या फस्त केल्या आहेत. एखादा हिंस्र प्राणी येऊन आपल्यावर हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने उपाययोजना करून येथील ग्रामस्थांना अभय द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हसदी परिसर विविध ठिकाणी हिंस्र प्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकंती करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिंस्र प्राणी मानवी वस्तीच्या अगदी जवळ येत असतात. त्यामुळे अशास्थितीत मानव व हिंस्र प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. प्राण्यांचा वावर वाढल्यास याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावरही होताना दिसून येतो.ग्रामस्थ शेतात तसेच ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी परिसरात वावरतात. हिंस्र प्राण्यांमुळे सध्या ग्रामीण भागामध्ये रब्बी हंगाम असून गहू, हरभरा, भुईमूग, कांदे, मका, रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी पिकांना रात्री पाणी देण्यासाठी जात असतो. पिकांना पाणी नाही दिल तर पीक हातची जातील त्यामुळे विज कंपनीने गांभीर्य ओळखून दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु शेतशिवारात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर धजावत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला असून हिंस्र प्राण्यांमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता वनविभागाने तत्परता दाखवणे गरजेचे आहे. मानवासह पाळीव प्राण्यांवरही हिंस्रप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अनेकवेळा पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकरी व पशुपालक मेटाकुटीस आला आहे. याबाबत वनविभागाने तातडीने हिंस्र प्राण्याला पिंजºयात जेरबंद करण्यात यावे, अशी अपेक्षा चिचंखेडे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे