शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

‘अक्कलपाडा’ पायथ्याशी वारंवार मानव व हिंस्त्रप्राण्यांचा संघर्ष सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 11:59 IST

म्हसदी, चिंचखेडा परिसर । मानवावर बिबट्याचा हल्ला तर पाळीव प्राणी फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथे अक्कलपाडा धरणाच्या पायथ्याशी असलेले हे गाव या गावालगत सध्या हिंस्र प्राण्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. या गावामध्ये तीन बिबट्या माद्यांनी आठ ते दहा बछड्यांना जन्म दिला असल्याचे याबाबत ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत वनविभागाने खबरदारीने पावले उचलावि. वन्य प्राण्यांचा मोठा वावर वाढल्यामुळे वारंवार मनुष्य व हिंस्त्रप्राणी यांचा संघर्ष सुरुच आहे.गेल्या आठ दिवसांपूर्वी माधव पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला तर रमेश बच्छाव यांच्या विहिरीत बिबट्याचा मृत्यू पावल्याची घटना घडली. अनेक जणांचे गोºहे तर अनेकांच्या शेळ्या फस्त केल्या आहेत. एखादा हिंस्र प्राणी येऊन आपल्यावर हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने उपाययोजना करून येथील ग्रामस्थांना अभय द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हसदी परिसर विविध ठिकाणी हिंस्र प्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकंती करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिंस्र प्राणी मानवी वस्तीच्या अगदी जवळ येत असतात. त्यामुळे अशास्थितीत मानव व हिंस्र प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. प्राण्यांचा वावर वाढल्यास याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावरही होताना दिसून येतो.ग्रामस्थ शेतात तसेच ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी परिसरात वावरतात. हिंस्र प्राण्यांमुळे सध्या ग्रामीण भागामध्ये रब्बी हंगाम असून गहू, हरभरा, भुईमूग, कांदे, मका, रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी पिकांना रात्री पाणी देण्यासाठी जात असतो. पिकांना पाणी नाही दिल तर पीक हातची जातील त्यामुळे विज कंपनीने गांभीर्य ओळखून दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु शेतशिवारात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर धजावत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला असून हिंस्र प्राण्यांमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता वनविभागाने तत्परता दाखवणे गरजेचे आहे. मानवासह पाळीव प्राण्यांवरही हिंस्रप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अनेकवेळा पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकरी व पशुपालक मेटाकुटीस आला आहे. याबाबत वनविभागाने तातडीने हिंस्र प्राण्याला पिंजºयात जेरबंद करण्यात यावे, अशी अपेक्षा चिचंखेडे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे