शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बारीपाड्याचा विकास म्हणजे एकी, विश्वास व मेहनतीचे फळ : सरसंघचालक मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:58 IST

ग्रामविकासातील पंचसूत्रीचा केला गौरव

ठळक मुद्देपारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत११०० एकर जंगलाला दिली भेटबारीपाड्यात हितचिंतकांची घेतली बैठक

आॅनलाईन लोकमतधुळे : संपूर्ण जग एका नव्या दिशेच्या शोधात आहे. एकी, विश्वास आणि मेहनतीच्या बळावर परिवर्तन घडवून बारीपाडा गावाने विकासाची ही नवी दिशा निश्चित केली आहे. याच गावाचा आदर्श ठेऊन अन्य गावांमध्ये त्यादिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बारीपाडा गावाचा गौरव केला.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाडा या छोट्याशा आदिवासी गावाने जल, जमीन, जंगल, जन आणि जानवर या ग्रामविकासातील पंचसूत्रीचा आधार घेऊन गेल्या २६ वर्षात आदर्श व स्वावलंबी ग्राम निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सरसंघचालक मंगळवारी बारीपाडा येथे आले होते.बारीपाड्यातील सर्व ग्रामस्थांनी येऊन अथक परिश्रमाच्या बळावर गावात परिवर्तन घडवून आणल्याचे ऐकले होते. आज प्रत्यक्ष बारीपाड्याचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाल्याबद्दल सरसंघचालकांनी समाधान व्यक्त केले.डॉ.मोहन भागवत यांनी अतिशय सहज आणि सोप्या शब्दात ग्रामस्थांशी संवाद साधला. सरसंघचालक म्हणाले की, माणूस व त्याचे माणूसपण टिकून राहिले तर गाव चांगला राहतो, हे आपण सिध्द केले आहे. मात्र आहे त्यापेक्षाही आपल्याला गाव चांगला करायचा आहे. चांगुलपणाची ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. आज पैसा हे सर्वस्व झालेल्या जगात समाधानी वृत्तीने राहता येऊ शकते याबद्दल साºया जगाला अप्रूप वाटत असल्याने लोक नव्या दिशेच्या शोधात आहेत. ही दिशा बारीपाड्याने नक्की केली असल्याचे गौरवोदगार डॉ.मोहन भागवत यांनी काढले.बारीपाड्यातील ग्रामस्थांनी घडवून आणलेल्या परिवर्तनाची कहाणी साºया देशभरात जाण्याची आवश्यकता आहे. हे परिवर्तन स्वत: अनुभवले असल्याने यापुढे जिथे जिथे संधी मिळेल, त्याठिकाणी बारीपाड्याच्या प्रयोगाबाबत मी माहिती देईल, असे आश्वासनही सरसंघचालकांनी यावेळी दिले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.मनीष सूर्यवंशी, लहानू चोधरी, विजय पवार व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. आनंद फाटक यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अभिमान पवार यांनी केली. बारीपाड्याच्या हितचिंतकांची एक बैठक झाली.पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागततत्पूर्वी सकाळी दहा वाजता डॉ. मोहनजी भागवत यांचे बारीपाडा गावात आगमन झाले. आगमन होताच पारंपारिक वनवासी नृत्य वाद्यांच्या साथीने सरसंघचालकांना ग्रामदर्शन घडविण्यात आले. बारीपाडा गावचे सरपंच अनिल पवार यांच्या निवासस्थानी गावातील भगिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.बारीपाड्याच्या ग्रामस्थांनी गेल्या २६ वर्षांत राखलेले ११०० एकर जंगल हे तेथील एक वैशिष्ट्य बनले आहे. या जंगलाला देखील सरसंघचालकांनी भेट दिली. या जंगलातील विविध वृक्षांच्या प्रजाती, औषधी वनस्पती, वनभाज्या या बरोबरच ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधलेले दगडी बंधारे, मातीचे बांध यांची देखील सविस्तर माहिती सरसंघचालकांनी ग्रामस्थांकडून घेतली. उजाड माळरानावर ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या जंगलाचे विहंगम दृश्य बघितल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित यांची यावेळी उपस्थिती होती. पाऊस असूनही ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत