शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे; आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:48 PM

सुधीर मुनगंटीवार : पांझरा नदी किनारी झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन

ठळक मुद्देआमदार गोटे यांनी कार्यक्रमात अर्थमंत्री यांना आम्हांला काही नको, असे सांगत आमच्यावर वरदहस्त राहू द्या, अशी मागणी केली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रस्तावित झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन झाले. शिवसैनिक व आमदार गोटे यांच्यात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या वादामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी पालकमंत्री दादा भुसे यांना पत्र देत कार्यक्रमात उपस्थित राहू नका, असे आवाहन केले होते. निष्ठावंत शिवसैनिकांच्या शब्दाचा मान ठेवत पालकमंत्री भुसे कार्यक्रमाला तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या देखील कार्यक्रमाला येणार असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, त्या देखील कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :   केवळ राजकारणासाठी राजकारण करायचे नाही, असे भाजपा पक्षाचे धोरण आहे. अगोदरच्या सरकारने देशात ४७ वर्ष २ महिने एक दिवस सत्ता उपभोगली. या काळात त्यांनी केलेली घाण साफ झाली का नाही, असे ते आम्हांला तीन वर्षात विचारू लागले आहेत. त्यांनी देशात करून ठेवलेली वाईट अवस्था आम्ही टप्प्याटप्याने संपवत आहोत. तरीही वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे, आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत, असे संतप्त प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. पांझरा नदी किनारी प्रस्तावित झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन गुरुवारी दुपारी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार अनिल गोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी (ग्रामीण), तेजस गोटे, माजी महापौर मंजूळा गावीत, रजक महासंघाचे राष्टÑीय प्रदेशाध्यक्ष बालाजी शिंदे, परिट समजाचे राष्टÑीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, राजेंद्र खैरनार व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहीद अली यांनी केले. आभार विजय वाघ यांनी मानले. 

मुलभूत गरजाही देऊ शकले नाही आधीचे सरकार भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या सरकारने सत्ता उपभोगत असताना केवळ झोप ठोकली. मुलूभूत गरजाही ते जनतेला देऊ शकले नाहीत. २००१ साली राज्यात ६३ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. त्या थांबविण्यासाठी ‘त्या’ सरकारने कुठलीही व्यवस्था केली नाही. केली असती, तर शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले नसते. भाजपा सरकार  सत्तेत आल्यानंतर विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन वर्षात जलयुक्त शिवार योजना, मुद्रा योजना, बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न, शेतकºयांची कर्जमाफी केली. देशासह राज्यात विकासाची कामे टप्प्याटप्याने सुरू आहेत. असे असतानाही देशात वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे असताना शिव्या मात्र विद्यमान सरकारला खावे लागत असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी येथे म्हटले. 

१५ आॅगस्टला होणार अनावरण कार्यक्रमात सफारी गार्डन अंतिम आराखडा कसा राहिल? यावर आधारित तयार केलेल्या पुस्तिकेचे मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले, की पांझरा नदी किनारी प्रस्तावित ११ कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या रस्त्यांना शहरातील विविध कॉलनी व परिसरातील ५४ रस्ते येऊन मिळणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. तसेच झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगेबाबा यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम हे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून १५ आॅगस्टला त्याचे अनावरण करण्यात येईल; असे त्यांनी सांगितले. 

कॉँग्रेसने पोसलेले  चोर देश सोडून पळू लागले कार्यक्रमात आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. त्यानंतर ते म्हणाले, की भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत आल्यामुळेच कॉँग्रेसने पोसलेले चोर पळू लागले आहेत. हे सांगताना त्यांनी विजय मल्ल्या, निरव मोदी यांची उदाहरणे दिली. कॉँग्रेस सरकारच्या काळात झालेली घाण आता आम्हांला साफ करावी लागत असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDhuleधुळे