शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

गणेश विसर्जनासाठी राहणार ३७ ठिकाणी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

जिल्ह्यात यंदा नियमांचे पालन करुन सुमारे ५०० मंडळांनी गणेशाची स्थापना केलेली आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत ...

जिल्ह्यात यंदा नियमांचे पालन करुन सुमारे ५०० मंडळांनी गणेशाची स्थापना केलेली आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. परिणामी दरवर्षी गणेशोत्सवात रोषणाईने झळाळणारे चौक यंदाच्या वर्षी सुनेसुने दिसून येत आहे. शहरात पहिल्या टप्प्यात दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यानंतर मंगळवारी पाचव्या दिवशी १० मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील सात मंडळांचा समावेश होता. श्री गणरायाची स्थापना होऊन सात दिवस झाले असून आजही सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे.

आता शेवटच्या टप्प्यात अनंत चतुदर्शीला गणरायांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. या दिवशी पांझरा नदीच्या पात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन हाेत असते. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली असून ते पूर्णत्वास आले आहे. कोरोनामुळे यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जन मिरवणुकीसह वाद्य वााजविण्याससुद्धा परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच घरगुतीसह खासगी आणि सार्वजनिक मंडळांना रात्री १० वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. पांझरा नदीलगत अशा ३७ ठिकाणी विसर्जनासाठी सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी स्वच्छ पाण्याने भरलेले हौद मूर्ती विसर्जनासाठी सोय करण्यात येणार आहे. याशिवाय निर्माल्य संकलनाचीदेखील सोय करण्यात येणार आहे. हत्तीडोह परिसरात विशेष सुविधा करण्यात येणार आहे. या भागात चार सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. प्रखर असे विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत. डेडरगाव तलाव, नकाणे तलाव आणि एमआयडीसी येथील तलावात मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अनंत चतुदर्शीला अनेक भाविक जलप्रदूषण होऊ नये म्हणून मूर्ती दान करतात किंवा कृत्रिम हौदात तिचे विसर्जन करत असतात. त्यानंतर महापालिकातर्फे सर्व मूर्तींचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाते. विसर्जनस्थळी जमा झालेल्या मूर्ती वाहून नेण्यासाठी महापालिकेने एसटी महामंडळाकडे २० ते २५ बसेसची मागणी केलेली आहे.