शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:17 IST

प्रतीक्षा : जिल्ह्यातील राष्टÑीयकृत बॅँकेच्या ७ हजार १९१ शेतकºयांना लाभ

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अर्ज करणा-या शेतक-यांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत. त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जमा झाली. उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे आहे. त्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केली आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठी अर्ज करणा-या ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी सुरू असून अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत समितीमार्फत सुरू आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकºयांपैकी  २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत; तर ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे शेतकरी आहेत. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना या वरील योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. 

५५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी ५५ हजार ५०३ शेतकºयांनी अर्ज करूनही त्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत केवळ ३२ हजार २०२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११७ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत केलेल्या समितीतर्फे सुरू आहे. या समितीने आतापर्यंत अनेक अर्ज रद्द ठरविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, समितीने  नेमके किती अर्ज रद्द ठरविले? याची अधिकृत माहिती प्रशासनाकडे अद्याप प्राप्त झालेली नाही.