शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:17 IST

प्रतीक्षा : जिल्ह्यातील राष्टÑीयकृत बॅँकेच्या ७ हजार १९१ शेतकºयांना लाभ

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अर्ज करणा-या शेतक-यांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत. त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जमा झाली. उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे आहे. त्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केली आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठी अर्ज करणा-या ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी सुरू असून अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत समितीमार्फत सुरू आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकºयांपैकी  २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत; तर ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे शेतकरी आहेत. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना या वरील योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. 

५५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी ५५ हजार ५०३ शेतकºयांनी अर्ज करूनही त्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत केवळ ३२ हजार २०२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११७ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत केलेल्या समितीतर्फे सुरू आहे. या समितीने आतापर्यंत अनेक अर्ज रद्द ठरविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, समितीने  नेमके किती अर्ज रद्द ठरविले? याची अधिकृत माहिती प्रशासनाकडे अद्याप प्राप्त झालेली नाही.