शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

धुळे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

धुळे- भविष्यात पाणीटंचाई उद्भवणाऱ्या धुळे तालुक्यातील गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. ज्या गावांना नवीन पाण्याची टाकी, ...

धुळे- भविष्यात पाणीटंचाई उद्भवणाऱ्या धुळे तालुक्यातील गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. ज्या गावांना नवीन पाण्याची टाकी, पाइपलाइन किंवा पाण्याचा स्रोतासाठी नवीन विहीर आवश्यक आहे. अशा कामांना तातडीने मंजुरी द्यावी. दरम्यान, आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ८३ गावांचा जल जीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनेशी संलग्नित विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

मे आणि जून महिन्यात उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पूर्व नियोजनासाठी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्याबाबत जिल्हा परिषदेच्या

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी आ. कुणाल पाटील यांनी गावनिहाय पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेतली. त्यानुसार ज्या गावांमध्ये सद्य:स्थितीत किंवा मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई जाणवू शकते अशा संभाव्य गावांकरिता आतापासूनच विहिरींचे अधिग्रहण करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पड्यार यांनी माहिती देताना सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस धुळे तालुक्यातील संभाव्य १२ गावांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. त्यात आर्णी, चिंचवार, नवलाणे, जुनवणे, अंचाळे तांडा, कुंडाणे (वेल्हाणे), बाबरे, तांडा कुंडाणे, जुन्नर, नावरी, नावरा, रामनगर (नगाव) या गावांचा समावेश आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहणासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, पांझरा नदी काठावर २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोत आहेत. त्या गावांत पाणीटंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार त्यांनी पांझरेत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे २९ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे, तर मांडळ, दोंदवाड, विंचूर, बोरकुंड, रतनपुरा या गावांमध्येही मे अखेरीस पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे मांडळ लघु प्रकल्पातून पाणी आवश्यकतेनुसार सोडण्याच्याही सूचना दिल्या. दरम्यान, रामनगर (नगाव) या आदिवासी वस्तीसाठी सातपायरी धरण क्षेत्रात विहीर खोदून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असल्याची माहिती दिली. पाणीटंचाई आढावा बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता जयदीप पाटील, शाखा अभियंता विजय गावित, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, कृउबाचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, पं.स. गटनेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, बाबरेचे सरपंच संतोष राजपूत, सुरेश पाटील, गरताडचे ग्रा.पं. सदस्य राजीव पाटील, कृष्णा पाटील, बापू खैरनार, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.