शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदा हा तर शेतकऱ्यांच्या फायद्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:22 IST

पत्रकार परिषद : खासदार डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

धुळे : मोदी सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे आहेत. ज्या सुधारणा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर त्याला विरोध कशासाठी, असा सवाल करीत कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या कायद्यात स्वामिनाथन आयोगाच्या बहुसंख्य शिफारशी लागू करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.कृषी कायदे आणि देशात शेतकºयांचे सुरू असलेले आंदोलन या विषयाच्या अनुषंगाने डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या समवेत महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, हिरामण गवळी, प्रा. अरविंद जाधव आदी उपस्थित होते.डॉ. भामरे म्हणाले, देशात कृषी कायद्यावर केवळ विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. वास्तविक पाहता शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सुधारणा ज्यावेळी झाल्या त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात होते. त्यामुळे ज्या सुधारणा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, आता देशपातळीवर झाल्या तर त्याला विरोध कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाच्या २०१९च्या घोषणापत्रात कृषी कायद्यांचा उल्लेख आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल. खासदार शरद पवार यांनी आॅगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खासगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता. माजी कृषिमंत्र्यांची मागणी होती तीच मोदी सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी मोदींचे अभिनंदन करायला हवे. केवळ मोदी द्वेषातून कृषी कायद्यांना विरोध होत असल्याचा आरोपही डॉ. भामरे यांनी केला.

टॅग्स :Dhuleधुळे