शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

कृषी कायदा हा तर शेतकऱ्यांच्या फायद्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:22 IST

पत्रकार परिषद : खासदार डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

धुळे : मोदी सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे आहेत. ज्या सुधारणा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर त्याला विरोध कशासाठी, असा सवाल करीत कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, या कायद्यात स्वामिनाथन आयोगाच्या बहुसंख्य शिफारशी लागू करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.कृषी कायदे आणि देशात शेतकºयांचे सुरू असलेले आंदोलन या विषयाच्या अनुषंगाने डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या समवेत महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, हिरामण गवळी, प्रा. अरविंद जाधव आदी उपस्थित होते.डॉ. भामरे म्हणाले, देशात कृषी कायद्यावर केवळ विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. वास्तविक पाहता शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सुधारणा ज्यावेळी झाल्या त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात होते. त्यामुळे ज्या सुधारणा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, आता देशपातळीवर झाल्या तर त्याला विरोध कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाच्या २०१९च्या घोषणापत्रात कृषी कायद्यांचा उल्लेख आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल. खासदार शरद पवार यांनी आॅगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खासगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता. माजी कृषिमंत्र्यांची मागणी होती तीच मोदी सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी मोदींचे अभिनंदन करायला हवे. केवळ मोदी द्वेषातून कृषी कायद्यांना विरोध होत असल्याचा आरोपही डॉ. भामरे यांनी केला.

टॅग्स :Dhuleधुळे