शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

१४ वर्षांनंतर प्रकल्प भरल्याने तडे जाणे तांत्रिक बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:34 IST

मालपूर : अमरावती मध्यम प्रकल्पातील बांधावर पडलेले तडे लवकरच बुजविण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प १४ वर्षांनंतर प्रथमच पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे मातीच्या बांधाला तडे जाणे ही तांत्रिक बाब आहे. तरी हे तडे लवकरच बुजविण्यात येणार असून बांधाला कुठलाही धोका नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी दिली.येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या माती बांधाला मोठे तडे पडले असून ते दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी तातडीने प्रकल्पाची पाहणी करून मालपूर ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी खुलासा केला आहे. तसेच ग्रामस्थांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. प्रकल्पाची पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर धरण सुरक्षितता संघटनेचे अधीक्षक अभियंता वाय.के. भदाणे व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव परिमंडळाचे अधीक्षक अभियंता वंजारी पाहणी करतात व त्यांनी सुचविलेल्या उणिवांवर अंमलबजावणी होते. तरीही तांत्रिक बाब म्हणून हे तडे लवकरच बुजविण्यात येतील, असेही म्हटले आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून त्याची मुर्हतमेढ १९८० साली रोजगार हमी योजनेंतर्गत झाली आहे. या धरणाची एकुण ३८५० मीटर लांबी असून धरणाची महत्तम उंची १७.९० मिटर आहे. या प्रकल्पाला अमरावती नदी पात्रात १४८.३० मीटर लांबीचा सांडवा आहे. दोन कालवे असून सन २०१६ पासून सिंचनासाठी हा कालवा हस्तांतरित झाला आहे. मात्र, १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक अपवाद सोडल्यास यावर्षी प्रथमच पुर्ण क्षमतेने प्रकल्प भरला आहे.दरम्यान, माती बांधाला तडे गेल्यामुळे पाणी वाया जाऊन पुन्हा मालपुरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो कि काय, अशी भीती ग्रामस्थांना आहे. तसेच येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे