शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

१४ वर्षांनंतर प्रकल्प भरल्याने तडे जाणे तांत्रिक बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:34 IST

मालपूर : अमरावती मध्यम प्रकल्पातील बांधावर पडलेले तडे लवकरच बुजविण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प १४ वर्षांनंतर प्रथमच पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे मातीच्या बांधाला तडे जाणे ही तांत्रिक बाब आहे. तरी हे तडे लवकरच बुजविण्यात येणार असून बांधाला कुठलाही धोका नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी दिली.येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या माती बांधाला मोठे तडे पडले असून ते दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी तातडीने प्रकल्पाची पाहणी करून मालपूर ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी खुलासा केला आहे. तसेच ग्रामस्थांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. प्रकल्पाची पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर धरण सुरक्षितता संघटनेचे अधीक्षक अभियंता वाय.के. भदाणे व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव परिमंडळाचे अधीक्षक अभियंता वंजारी पाहणी करतात व त्यांनी सुचविलेल्या उणिवांवर अंमलबजावणी होते. तरीही तांत्रिक बाब म्हणून हे तडे लवकरच बुजविण्यात येतील, असेही म्हटले आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून त्याची मुर्हतमेढ १९८० साली रोजगार हमी योजनेंतर्गत झाली आहे. या धरणाची एकुण ३८५० मीटर लांबी असून धरणाची महत्तम उंची १७.९० मिटर आहे. या प्रकल्पाला अमरावती नदी पात्रात १४८.३० मीटर लांबीचा सांडवा आहे. दोन कालवे असून सन २०१६ पासून सिंचनासाठी हा कालवा हस्तांतरित झाला आहे. मात्र, १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक अपवाद सोडल्यास यावर्षी प्रथमच पुर्ण क्षमतेने प्रकल्प भरला आहे.दरम्यान, माती बांधाला तडे गेल्यामुळे पाणी वाया जाऊन पुन्हा मालपुरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो कि काय, अशी भीती ग्रामस्थांना आहे. तसेच येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे