शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

१४ वर्षांनंतर प्रकल्प भरल्याने तडे जाणे तांत्रिक बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:34 IST

मालपूर : अमरावती मध्यम प्रकल्पातील बांधावर पडलेले तडे लवकरच बुजविण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प १४ वर्षांनंतर प्रथमच पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे मातीच्या बांधाला तडे जाणे ही तांत्रिक बाब आहे. तरी हे तडे लवकरच बुजविण्यात येणार असून बांधाला कुठलाही धोका नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी दिली.येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या माती बांधाला मोठे तडे पडले असून ते दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी तातडीने प्रकल्पाची पाहणी करून मालपूर ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी खुलासा केला आहे. तसेच ग्रामस्थांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. प्रकल्पाची पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर धरण सुरक्षितता संघटनेचे अधीक्षक अभियंता वाय.के. भदाणे व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव परिमंडळाचे अधीक्षक अभियंता वंजारी पाहणी करतात व त्यांनी सुचविलेल्या उणिवांवर अंमलबजावणी होते. तरीही तांत्रिक बाब म्हणून हे तडे लवकरच बुजविण्यात येतील, असेही म्हटले आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून त्याची मुर्हतमेढ १९८० साली रोजगार हमी योजनेंतर्गत झाली आहे. या धरणाची एकुण ३८५० मीटर लांबी असून धरणाची महत्तम उंची १७.९० मिटर आहे. या प्रकल्पाला अमरावती नदी पात्रात १४८.३० मीटर लांबीचा सांडवा आहे. दोन कालवे असून सन २०१६ पासून सिंचनासाठी हा कालवा हस्तांतरित झाला आहे. मात्र, १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक अपवाद सोडल्यास यावर्षी प्रथमच पुर्ण क्षमतेने प्रकल्प भरला आहे.दरम्यान, माती बांधाला तडे गेल्यामुळे पाणी वाया जाऊन पुन्हा मालपुरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो कि काय, अशी भीती ग्रामस्थांना आहे. तसेच येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे