शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

धुळ्यात कृषी विद्यापीठासाठी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:04 IST

शासनाने नेमलेल्या डॉ.थोरात, डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अमलबजावणी करावी

ठळक मुद्देजिल्ह्यातील २०० ग्रामसभांनी कृषी विद्यापीठासाठी केला आहे ठरावअर्थसंकल्पीय अधिवेशात कृषी विद्यापीठाची घोषणा करावीकोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषीविद्यापीठ आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात झाले पाहिजे यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘स्मरण धरणे आंदोलन’ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. त्याचबरोबर शासनाने नेमलेल्या डॉ. एस.वाय.थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.धरणे आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांनी केले होते.निवेदनात म्हटले आहे की, १९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. त्यावेळी संभाव्य कृषी विद्यापीठ धुळ्यात होणे अपेक्षित होते. १९६३-६४ मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतांना राहूरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करून, नवीन विद्यापीठ निर्माण करण्यााठी शासनाने डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. यात ज्या ठिकारी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा समितीचा अहवाल आहे. त्यात धुळ्याचे नाक प्राधान्यक्रमावर आहे.गेल्या २१ जानेवारी १६ रोजी सर्व महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मागणी तीव्र असल्याचे दर्शवून दिले. तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्याची एकमुखी मागणी केली आहे.आघाडी व युती शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात धुळ्याचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही अहवालांची अंमलबजावणी करून, धुळे जिल्ह्यात लवकरात लवकर कृषी विद्यापीठ स्थापन करावे, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन कृषी विद्यापीठाची घोषणा व्हावी, अशी मागणी केली.राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. विद्यापीठाचे मुख्य लक्ष राहुरी, पुणे, कोल्हापूरकडे आहे. यामुळे या विभागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरीता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे.खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचा बराच भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे कोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे असेही निवेदनात म्हटले आह.यावेळी अतुल सोनवणे, धीरज पाटील, भुपेंद्र लहामगे, यशवर्धन कदमबांडे, नाना कदम, पंकज गोरे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील, कमलेश भामरे आदी उपस्थित होते.