शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

धुळ्यात कृषी विद्यापीठासाठी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:04 IST

शासनाने नेमलेल्या डॉ.थोरात, डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अमलबजावणी करावी

ठळक मुद्देजिल्ह्यातील २०० ग्रामसभांनी कृषी विद्यापीठासाठी केला आहे ठरावअर्थसंकल्पीय अधिवेशात कृषी विद्यापीठाची घोषणा करावीकोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषीविद्यापीठ आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात झाले पाहिजे यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘स्मरण धरणे आंदोलन’ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. त्याचबरोबर शासनाने नेमलेल्या डॉ. एस.वाय.थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.धरणे आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांनी केले होते.निवेदनात म्हटले आहे की, १९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. त्यावेळी संभाव्य कृषी विद्यापीठ धुळ्यात होणे अपेक्षित होते. १९६३-६४ मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतांना राहूरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करून, नवीन विद्यापीठ निर्माण करण्यााठी शासनाने डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. यात ज्या ठिकारी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा समितीचा अहवाल आहे. त्यात धुळ्याचे नाक प्राधान्यक्रमावर आहे.गेल्या २१ जानेवारी १६ रोजी सर्व महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मागणी तीव्र असल्याचे दर्शवून दिले. तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्याची एकमुखी मागणी केली आहे.आघाडी व युती शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात धुळ्याचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही अहवालांची अंमलबजावणी करून, धुळे जिल्ह्यात लवकरात लवकर कृषी विद्यापीठ स्थापन करावे, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन कृषी विद्यापीठाची घोषणा व्हावी, अशी मागणी केली.राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. विद्यापीठाचे मुख्य लक्ष राहुरी, पुणे, कोल्हापूरकडे आहे. यामुळे या विभागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरीता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे.खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचा बराच भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे कोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे असेही निवेदनात म्हटले आह.यावेळी अतुल सोनवणे, धीरज पाटील, भुपेंद्र लहामगे, यशवर्धन कदमबांडे, नाना कदम, पंकज गोरे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील, कमलेश भामरे आदी उपस्थित होते.