शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित

By अतुल जोशी | Updated: January 25, 2024 17:28 IST

उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे.

अतुल  जोशी,धुळे : उन्हाळा सुरू होण्यास जवळपास एक महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागलेली आहे. शिंदखेडा तालुक्यातील एका गावात टँकरने पाणीपुरवठा होऊ लागला आहे, तर जिल्ह्यातील २६ गावांसाठी विहीर अधिग्रहित करण्यात आलेली आहे. आताच अशी परिस्थिती असल्याने, उन्हाळ्यात टँकरसह विहीर अधिग्रहणाचा आकडाही फुगणार, हे स्पष्ट आहेे. धुळे जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही, तसेच विहिरींच्या जलपातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत विहिरींनी तळ गाठलेला आहे.

ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यातील डाबली गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आलेला आहे, तर जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी २६ विहिरी अधिग्रहित केेलेल्या असून, त्यात धुळे तालुक्यात २, साक्री तालुक्यात २ व शिंदखेडा तालुक्यातील २२ गावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळेwater scarcityपाणी टंचाई