शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील  २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित

By अतुल जोशी | Updated: December 22, 2023 17:46 IST

ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यात २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

अतुल जोशी,धुळे : ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यात २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर चुडाणे गावासाठी सुरू असलेला पाण्याचा टँकर तूर्त बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.

धुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी ५८८.७ मिमी एवढी असून, सप्टेंबर २०२३ अखेर ४६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची टक्केवारी ७९ एवढी आहे. यावेळी जवळपास २१ टक्के पाऊस कमी झाला. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील जलपातळीत सरासरीच्या तुलनेत ०.८० मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील १ व शिंदखेडा तालुक्यातील १९ अशा एकूण २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात अधिग्रहित विहिरींची संख्या वाढणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळेwater scarcityपाणी टंचाई