शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By अतुल जोशी | Updated: September 21, 2022 17:03 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील ३० तरुण मंगळवारी चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले.

धुळे : 'अग्निवीर'च्या भरतीसाठी मुंबईत जाणाऱ्या वडजाई येथील तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कल्याण स्थानकावर घडली. रामेश्वर भरत देवरे (२०, रा. वडजाई) असे मयत तरुणाचे नाव आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निवीर' सैन्य भरतीसाठी वडजाई येथील ३० तरुण मंगळवारी चाळीसगाव व तेथून मुंबईला रेल्वेने गेले. बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हे सर्वजण कल्याण येथे पोहोचले. तेथून हे तरुण मुंब्रा येथे 'अग्निवीर'च्या भरतीसाठी जाणार होते. मात्र, रामेश्वर भरत देवरे (२०) याला मळमळ होऊ लागल्याने, तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. वाकून उलटी करीत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्याने, मित्रही घाबरले होते.

रामेश्वर देवरे याचा कॉम्प्युटर डिप्लोमा झाला होता. रिकाम्या वेळेत तो वडिलांना शेतातील कामासाठी मदत करायचा. शेतात पिकविलेला भाजीपाला स्वतः विक्री करून तो आई-वडिलांना मदत करीत होता. नोकरीच्या अपेक्षेने दिवस-रात्र मेहनतही करीत होता. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल, असे वडील सांगत असल्यामुळे त्याने सैन्यात जाण्याची तयारी केली होती. मात्र, देशसेवा करण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. तो वडजाईचे उपसरपंच संजय महाराज देवरे यांचा पुतण्या होता.

टॅग्स :AccidentअपघातDhuleधुळेkalyanकल्याण