शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

७ लाख ९७ हजार बालकांना मिळणार जंतनाशकाची गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:09 IST

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार ...

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंत नाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची ग्रामीण व शहरी भागात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३२ उपकेंद्र, २ उपजिल्हा रुग्णालय, १३ मनपाचे दवाखाने, २,२४६ अंगणवाडी, १,८४८ शासकीय व खासगी शाळांमार्फत गाेळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

देशात ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. देशात २८ टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. त्याची प्रमुख कारणे म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक स्वरूपाचा असून, मुलांना कमकुवत करणारा आहे. कृमी दोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे, शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. देशात ६ ते ५९ महिने वयोगटांतील प्रत्येकी दहा बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्तही असू शकते, तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटांतील किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो.

देशात पाच वर्षांखालील सुमारे ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत. साधारणतः ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशकाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व पूर्व शालेय वयोगटांतील मुलांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी १ मार्च, २०२१ व ८ मार्च, २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानीत शाळा, खासगी शाळा, तसेच अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा येथे जेवणानंतर जंतनाशक गोळीचा लाभ देण्यात येणार आहे. गोळी ही जेवण करूनच घ्यावी. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचा सहभाग आहे. या दिवशी जंतनाशक गोळी दिली गेली नाही, तर अशा बालकांना ८ मार्च रोजी मॉप-अप दिनी जेवणानंतर ही गोळी देण्यात येणार आहे.

या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नवले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे यांनी केले आहे.