शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ६ शेतकºयांची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 23:00 IST

नापिकी, कर्जबाजारीपणा : कर्जमाफीचाही लाभ नाही 

ठळक मुद्देसरकार अशा कुटुंबांना एक लाख रुपयाची मदत देते. त्यापैकी ३० हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात येतात. तर उर्वरीत ७० हजार रुपये घरातील कर्त्या व्यक्तींच्या विशेषत: पत्नीच्या नावे बॅँकेत ठेव स्वरुपात ठेवले जातात. त्यापासून मिळणारे व्याज त्या कुटुंबाला मिळते. तून घरातील कर्त्या पुरूषाच्या धक्क्याने सैरभैर झालेल्या कुटुंबास थोडा दिलासा मिळतो. परंतु सध्या महागाईमुळे ही मदत तुटपुंजी ठरत असल्याचेही प्रत्ययास येत आहे. सरकारने या बाबत विचार केला पाहिजे, अशी भावना या कुटुंबीयांकडून व्यक्त होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. चालू सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. कारण चालू वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात ३२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून आकडेवारीवरून त्याची कल्पना येते. राज्यात साधारण २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रत्ययास येण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात मात्र २००३ पर्यंत याबाबत निरंक स्थिती होती. मात्र २००४ व २००५ मध्ये अनुक्रमे तीन व दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्या. दोन वर्ष आत्महत्या केलेल्या शेतकºयांची संख्या एक आकडी होती. मात्र २००६ पासून शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी दुहेरी आकडा गाठला. त्या वर्षी तब्बल ४२ शेतकºयांनी आत्महत्या केली. त्यासाठी नापिकी, कर्जबाजारीपणा, नष्ट झालेले उत्पादन, सरकारी मदत मिळण्यात दिरंगाई अशी एक ना अनेक कारणे होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचा दुहेरी आकडा आजतागायत कायम राहिला आहे. गेल्या दोन-तीन वर्षात शेतकरी आत्महत्येच्या घटनांत आणखी वाढ झाली आहे. २०१५ मध्ये हा आकडा प्रथमच ६५ वर पोहचला. २०१७ मध्ये तो आणखी वाढून ७४ वर गेला. तर गतवर्षी २०१८ मध्ये ७६ शेतकºयांनी आत्महत्या केली. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहायता समिती गठीत करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीच्या प्रस्तावावर ही समिती विचारपूर्वक निर्णय घेते. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत समोर आलेल्या चार प्रस्तावांपैकी दोन पात्र तर दोन अपात्र ठरविले. २००४ पासून २०१७ पर्यंत ५८७ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी  मदतीचे ३३९ प्रस्ताव पात्र ठरले तर २४८ कुटुंबांचे प्रस्ताव अपात्र ठरविले गेले आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी