शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सीबीएसईचे ५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

धुळे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली आहे तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ...

धुळे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली आहे तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात सीबीएसईचे दहावीचे ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत.

याबाबत पालकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही पालक म्हणतात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे तर काहींच्या मते जीवापेक्षा परीक्षा महत्वाची नाही. काही पालकांनी मात्र परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध केला आहे. ऑनलाईन का असेना पण आळस येऊ नये यासाठी परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुहेरी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिक्षणापेक्षा आरोग्याला प्राधान्य देणे उचित आहे. कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे बोर्डाने कठोर निर्णय घेतला आहे. परंतु ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या विद्यार्थी परीक्षा देऊ शकले असते असे मतही त्यांनी नोंदविले आहे.

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना निकालाची चिंता सतावत आहे. निकालासाठी मंडळाने वस्तुनिष्ठ निकष ठरवला आहे. निकालाबद्दल विद्यार्थ्याना हरकत घेता येणार आहे.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

मुले २८९

मुली २११

११ वी, आयटीआय प्रवेश कसे होणार

दहावीची गुणपत्रिका, टक्केवारी पाहून ११ वी आणि आयटीआयला प्रवेश दिला जातो. परंतु दहावीच्या विद्यार्थ्याना परीक्षा न घेता सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने ११ वी आणि आयटीआयला प्रवेश कसा द्यावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कला शाखेला जाणाऱ्यांच्या बाबतीत फारशी अडचण येणार नाही. पण विज्ञान आणि वाणिज्यला प्रवेश घेताना घोळ होऊ शकतो.

गुणदान सम पाळीवर कसे आणणार

यंदा परीक्षाच रद्द करुन सरसकट सर्व विद्यार्थ्याना उत्तीर्ण केल्याने गुण कसे दिले जातील. मागील वर्षांची प्रगती पाहून गुण देण्याचा विचार असला तरी काही विद्यार्थ्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सर्वच विद्यार्थ्याना गुण न देता केवळ उत्तीर्ण केले तर पेच निर्माण होईल. गुणदान सम पातळीवर आणण्यासाठी सीबीएसई बोर्डाला मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.

बोर्ड परीक्षा ही झालीच पाहिजे ऑफलाईन होण्यासाठी अडचणी येत असतील तर टप्प्याटप्याने ऑनलाईन घेऊन विद्यार्थ्याना पुढील प्रवेशासाठी मोकळे करावे. परीक्षेचे महत्व विद्यार्थ्याना असलेच पाहिजे काही अंशी तरी त्याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.

- अनिल जैन, पिंपळनेर

आयुष्यात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागत असते. कोणतीच परीक्षा आपल्या जीवापेक्षा महत्वाची नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे. शासनाने घेतलेला निर्णय विद्यार्थी हिताच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

- रमेश साळुंके, शिरपूर

कोरोनाचा संसर्ग बघता परीक्षा रद्द होणे,ठीक असले तरी परीक्षा होणे महत्त्वाचे होते.या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आम्ही शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली आहे. एक वर्षापासून विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. हे चुकीचे आहे. - संदीप पाटील, दोंडाईचा

शाळा आणि परीक्षा महत्वाची नसून शिक्षण महत्वाचे आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. शिक्षणत खंड पडू दिला नाही. महामारीच्या काळात काही कठोर निर्णय शासन घेत आहे. नियमांचे पालनही केले पाहिजे. शिवाय शाळा, शिक्षण आणि परीक्षेपेक्षाही आरोग्य महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने परीक्षेसाठी विद्यार्थींच्या जीविताचा धोका पत्करणे उचित होणार नाही. परंतु ऑनलाईन परीक्षेचा पर्याय स्वीकारायला हरकत नव्हती. - प्रा. पी. आर. पवार, धुळे