शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मालपुरात ४०० कोंबड्या पडल्या मृत्युमुखी; अज्ञात माथेफिरूने विषारी पदार्थ खाऊ घातल्याने घडला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 18:49 IST

मालपुरात ४०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. 

रवींद्र राजपूत 

मालपूर (धुळे) : अज्ञात माथेफिरूने जाळी तोडून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना विषारी पदार्थ खाऊ घातल्याने, सुमारे ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकाचे दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही. 

मालपूर येथील योगेश सोनवणे, विलास माळी यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. गावालगतच त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. बुधवारी सायंकाळी अज्ञात माथेफिरूने शेडची मागील जाळी तोडून या कोंबड्यांना गव्हाच्या दाण्यात काही विषारी पदार्थ टाकल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कुक्कुटपालन करणाऱ्यांनी या कोंबड्यांना खाद्य व पिण्याचे पाणी दिले. यावेळी सर्व कोंबड्या सुखरूप होत्या. मात्र साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास योगेश सोनवणे, विलास माळी पुन्हा त्यांची देखरेख करण्यासाठी गेले असता तेथे सर्वच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. यावेळी पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूची जाळी तोडून अज्ञात माथेफिरूने गव्हाच्या दाण्यामधे विषारी पदार्थ टाकल्याचे आढळून आले. यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आलेला नव्हता.

दोन दिवसांपूर्वीच तेले शिवारात नानाभाऊ भिल यांच्या शेडमध्येही असाच प्रकार घडला. अज्ञाताने कोंबड्यांना विषारी पदार्थ खाऊ घातल्याने नानाभाऊ भिल यांच्या २०० कोंबड्या दगावल्या. 

 

टॅग्स :Dhuleधुळे