शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१९ कोटींच्या कामांतून गावांचा होणार कालापालट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

बोरकुंड, रतनपुरा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी १४ रोजी बोरकुंड येथे संपन्न झाला. या ...

बोरकुंड, रतनपुरा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी १४ रोजी बोरकुंड येथे संपन्न झाला. या समारंभाप्रसंगी भुसे दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. बोरकुंड व रतनपुरा जि. प.गटात विविध शासकीय योजनांतून, अवघ्या चौदा महिन्याच्या अल्प कालावधीत १ हजार ९०९ लाखांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

बोरकुंड येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे धुळे नंदूरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे होते. तर विकासकामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह संपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, डाॅ. तुळशीराम गावित, महेश मिस्तरी, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, किरण जोंधळे, उपजिल्हाप्रमुख आधार हाके, संघटक विलास चौधरी, देवराम माळी, तालुकाप्रमुख धनराज पाटील, चंद्रकांत म्हस्के, गुलाब माळी, परशुराम देवरे, साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी जि.प. सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे, माजी जि. प. सदस्य देविदास माळी, माजी जि.प.सदस्य प्रभाकर पाटील, पं.स.सदस्य देवेंद्र माळी, पं.स.सदस्य बाबाजी देसले आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यात ड्रिप एरिगेशन, पीकविमा आदींबाबत समस्या जाणून घेतल्या. बोरी काठावरील वसलेल्या गावांचा पोखरा योजनेत आमच्या गावांचा समावेश करावा असा आग्रह यावेळी शेतकऱ्यांनी धरला. यावर मालेगाव तालुक्यातील गावांबरोबर बोरकुंड परिसरातील गावांचा या योजनेत समावेश केला जाईल अशी शाश्वती मंत्री भुसे यांनी दिली. तसेच मांडळ धरणाचा कॅनाॅल दुरुस्ती, गिरणा डावा कालवा दुरुस्ती, २५-१५ योजनेतून गावांसाठी पायाभूत सुविधा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या, यास मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, तुम्हाला ज्या अडीअडचणी असतील त्या सोडविल्या जातील, तसेच त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

यावेळी बबनराव थोरात, हिलाल माळी, महेश मिस्तरी, तुळशीराम गावित आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळसाहेब भदाणे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, चौदा महिन्याच्या अत्यंत कमी कालावधीत बोरकुंड, रतनपुरासह नाणे, चांदे, होरपाडे, सिताणे, दोंदवाड, नंदाळे, तरळाडे, विंचूर या गावांचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यात गावाला जोडणारे व गावांतर्गत रस्ते मजबुतीकरण, काँक्रिटीकरण वा डांबरीकरण करणे, स्वच्छतागृह व शाळा खोल्या बांधणे, भूमिगत गटारी करणे, नदी व नाल्यावर विविध प्रकारचे बंधारे, तळफरशी वा संरक्षक भिंत बांधणे, विविध गावात जलशुद्धीकरण संयंत्र बसवणे, खुल्या जागेवर व्यायामशाळा साहित्य, शेतीसाठी नवीन रोहित्र बसवणे आदी कामांसाठी तब्बल १९ कोटी निधी मंजूर करण्यात यश आले आहे, भविष्यातही ही विकासगंगा अशीच राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर भदाणे यांनी तर आभारप्रदर्शन नीरज बागुल यांनी केले.