शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६२ बालक झाले कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:37 IST

महिला व बालविकास विभाग : २३२ अंगणवाड्यांमधील ग्रामबालविकास केंद्रात दाखल केली होती ४६६ कुपोषित बालके

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडीस्तरावर ग्राम बाल विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६६ पैकी १६२ बालके ही सर्वसाधारण श्रेणीत (कुपोषणमुक्त) झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.कुपोषणमुक्ततेसाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे.जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.जिल्ह्यात बालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ४८३ तीव्र, ९९९ मध्यम अशी एकूण १४८२ बालके कुपोषित आढळली होती.या बालकांना सर्वसाधारण मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी त्यांना २३२ अंगणवाड्यांमधील ग्राम बालविकास केंद्रात जून ते आॅगस्ट १८ या कालावधीत दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या बालकांना १२ आठवडे पोषक आहार देण्यात आला. या बारा आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासण्यात आले होते.तीन महिन्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेक बालकांमध्ये सुधारण झाल्याचे दिसून आले.४६६ तीव्र कुपोषित बालकांपैकी १६२ बालके हे सर्वसाधारण श्रेणीत म्हणजे कुपोषणमुक्त झाले आहेत. तर २४३ बालक हे तीव्रमधून मध्यम स्वरूपात आले आहे. मात्र ६१ बालकांमध्ये कुठलही सुधारणा होऊ शकलेली नाही.तीव्र कुपोषितमधून सर्वसाधारण श्रेणीत आलेल्या बालकांची टक्केवारी ३४.७६, तीव्रमधून मध्यमस्वरूपात आलेल्या बालकांची टक्केवारी ५२.१५ तर सुधारणा होऊ न शकलेल्या बालकांची टक्केवारी १३.०९ एवढी आहे.३४५८ कुपोषित बालके आढळलीजिल्ह्यात सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्यात कुपोषित बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ३ हजार ४५८ बालके ही तीव्र कुपोषित बालके आढळली होती. या बालकांना १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर त्यांना १२ आठवडे सकस आहार दिला जाणार आहे. त्यामुळे या बालकांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्राम बालविकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे