शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जिल्ह्यातील १६२ बालक झाले कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:37 IST

महिला व बालविकास विभाग : २३२ अंगणवाड्यांमधील ग्रामबालविकास केंद्रात दाखल केली होती ४६६ कुपोषित बालके

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडीस्तरावर ग्राम बाल विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६६ पैकी १६२ बालके ही सर्वसाधारण श्रेणीत (कुपोषणमुक्त) झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.कुपोषणमुक्ततेसाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे.जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.जिल्ह्यात बालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ४८३ तीव्र, ९९९ मध्यम अशी एकूण १४८२ बालके कुपोषित आढळली होती.या बालकांना सर्वसाधारण मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी त्यांना २३२ अंगणवाड्यांमधील ग्राम बालविकास केंद्रात जून ते आॅगस्ट १८ या कालावधीत दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या बालकांना १२ आठवडे पोषक आहार देण्यात आला. या बारा आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासण्यात आले होते.तीन महिन्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेक बालकांमध्ये सुधारण झाल्याचे दिसून आले.४६६ तीव्र कुपोषित बालकांपैकी १६२ बालके हे सर्वसाधारण श्रेणीत म्हणजे कुपोषणमुक्त झाले आहेत. तर २४३ बालक हे तीव्रमधून मध्यम स्वरूपात आले आहे. मात्र ६१ बालकांमध्ये कुठलही सुधारणा होऊ शकलेली नाही.तीव्र कुपोषितमधून सर्वसाधारण श्रेणीत आलेल्या बालकांची टक्केवारी ३४.७६, तीव्रमधून मध्यमस्वरूपात आलेल्या बालकांची टक्केवारी ५२.१५ तर सुधारणा होऊ न शकलेल्या बालकांची टक्केवारी १३.०९ एवढी आहे.३४५८ कुपोषित बालके आढळलीजिल्ह्यात सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्यात कुपोषित बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ३ हजार ४५८ बालके ही तीव्र कुपोषित बालके आढळली होती. या बालकांना १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर त्यांना १२ आठवडे सकस आहार दिला जाणार आहे. त्यामुळे या बालकांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्राम बालविकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे