शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

जिल्ह्यातील १६२ बालक झाले कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:37 IST

महिला व बालविकास विभाग : २३२ अंगणवाड्यांमधील ग्रामबालविकास केंद्रात दाखल केली होती ४६६ कुपोषित बालके

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडीस्तरावर ग्राम बाल विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६६ पैकी १६२ बालके ही सर्वसाधारण श्रेणीत (कुपोषणमुक्त) झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.कुपोषणमुक्ततेसाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे.जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.जिल्ह्यात बालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ४८३ तीव्र, ९९९ मध्यम अशी एकूण १४८२ बालके कुपोषित आढळली होती.या बालकांना सर्वसाधारण मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी त्यांना २३२ अंगणवाड्यांमधील ग्राम बालविकास केंद्रात जून ते आॅगस्ट १८ या कालावधीत दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या बालकांना १२ आठवडे पोषक आहार देण्यात आला. या बारा आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासण्यात आले होते.तीन महिन्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेक बालकांमध्ये सुधारण झाल्याचे दिसून आले.४६६ तीव्र कुपोषित बालकांपैकी १६२ बालके हे सर्वसाधारण श्रेणीत म्हणजे कुपोषणमुक्त झाले आहेत. तर २४३ बालक हे तीव्रमधून मध्यम स्वरूपात आले आहे. मात्र ६१ बालकांमध्ये कुठलही सुधारणा होऊ शकलेली नाही.तीव्र कुपोषितमधून सर्वसाधारण श्रेणीत आलेल्या बालकांची टक्केवारी ३४.७६, तीव्रमधून मध्यमस्वरूपात आलेल्या बालकांची टक्केवारी ५२.१५ तर सुधारणा होऊ न शकलेल्या बालकांची टक्केवारी १३.०९ एवढी आहे.३४५८ कुपोषित बालके आढळलीजिल्ह्यात सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्यात कुपोषित बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ३ हजार ४५८ बालके ही तीव्र कुपोषित बालके आढळली होती. या बालकांना १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर त्यांना १२ आठवडे सकस आहार दिला जाणार आहे. त्यामुळे या बालकांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्राम बालविकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे