शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडा आवर्तनाचा १०० गावांना फायदा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:45 IST

२०० दलघफू पाणी  : धुळे, शिंदखेड्यासह अमळनेर तालुक्यातील गावांचा प्रश्न सुटणार

ठळक मुद्देआवर्तनाचा तीन तालुक्यांना फायदा२०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेलबंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पांझरा नदीकाठावर पाणीपुरवठा योजना असलेल्या १०० पेक्षा जास्त गावांना अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून लवकरच सुटणाºया आवर्तनाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने धुळे पाटबंधारे विभागाला आदेश दिले असून साक्री तालुक्यातील पुनर्वसित तामसवाडी गावाजवळ असलेल्या बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बुधवारी किंवा गुरूवारी प्रकल्पातून २०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. तेथे पाणी पोहचले की ते आवर्तनाचे यश मानले जाते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयात पाणी पोहचले की अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविले जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होतो. त्यातील ९० गावे धुळे जिल्ह्यातील तर १०-१५ गावे जळगाव जिल्ह्यातील असतात, असे सूत्रांनी सांगितले. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी पांझरा नदीकाठी आहेत.   दरवर्षीच होते कसरत अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडावयाचे असल्यास सर्वप्रथम नदीपात्रातील बंधाºयांच्या फळ्या काढल्या जातात. या बंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत असते. त्यामुळे बंधाºयातील फळ्या काढण्यासाठी मोठी  कसरत करावी लागते.