शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

अक्कलपाडा आवर्तनाचा १०० गावांना फायदा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:45 IST

२०० दलघफू पाणी  : धुळे, शिंदखेड्यासह अमळनेर तालुक्यातील गावांचा प्रश्न सुटणार

ठळक मुद्देआवर्तनाचा तीन तालुक्यांना फायदा२०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेलबंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पांझरा नदीकाठावर पाणीपुरवठा योजना असलेल्या १०० पेक्षा जास्त गावांना अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून लवकरच सुटणाºया आवर्तनाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने धुळे पाटबंधारे विभागाला आदेश दिले असून साक्री तालुक्यातील पुनर्वसित तामसवाडी गावाजवळ असलेल्या बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बुधवारी किंवा गुरूवारी प्रकल्पातून २०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. तेथे पाणी पोहचले की ते आवर्तनाचे यश मानले जाते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयात पाणी पोहचले की अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविले जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होतो. त्यातील ९० गावे धुळे जिल्ह्यातील तर १०-१५ गावे जळगाव जिल्ह्यातील असतात, असे सूत्रांनी सांगितले. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी पांझरा नदीकाठी आहेत.   दरवर्षीच होते कसरत अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडावयाचे असल्यास सर्वप्रथम नदीपात्रातील बंधाºयांच्या फळ्या काढल्या जातात. या बंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत असते. त्यामुळे बंधाºयातील फळ्या काढण्यासाठी मोठी  कसरत करावी लागते.